मुंबई : भाजपला सात वर्षे पूर्ण झाल्याने भाजपच्या कारभाराचा निषेध म्हणून काँग्रेसने आंदोलने केली. तर राष्ट्रवादीने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सात वर्षात जेवढी स्वप्ने दाखवली त्यातली एकही गोष्ट त्यांनी पूर्ण केली नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाना साधला आहे.
केंद्र सरकारने अपने कार्यकाल के सात साल पुरे किए है और प्रधानमंत्री मोदीजी ने अपने कार्यकाल के दुसरे चरण के दो साल पुरे किए है। इस समय केंद्र सरकार की विफलता पर राज्य के अल्पसंख्यक मंत्री श्री. @nawabmalikncp जी ने निशाना साधा है।#7YearsOfFailure #7yearsOfModiMadeDisaster pic.twitter.com/BkKZcs178E
— NCP (@NCPspeaks) May 31, 2021
सात वर्षात महागाई कमी झाली नाही. पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये आले नाहीत. दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले. त्यापैकी कुणालाच रोजगार मिळाला नाही. मोदींनी जी जी स्वप्ने दाखवली त्यातील एकपण पूर्ण केले नाही, अशी टीका मलिक यांनी केली आहे.
दुसरे चरण मे कोविड नियंत्रित करने में केंद्र सरकार असफल रही। समय पे निर्णय नही लिए गये, उचित कदम नही उठाए गये। इसलिए करोड़ों लोग कोरोना से बाधित हुए। लाखो लोगोंका निधन हो गया। – @nawabmalikncp#7YearsOfFailure #7yearsOfModiMadeDisaster
— NCP (@NCPspeaks) May 31, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन टर्म आणि केंद्र सरकारने सात वर्षे पूर्ण केली आहेत. मोदी दुसऱ्या टर्ममध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहेत. वेळेत निर्णय घेण्यात आले नाहीत. वेळेत ज्या वस्तूंची आवश्यकता होती त्यावरही योग्य निर्णय घेतला नसल्याने कोट्यवधी लोक कोरोना बाधित झाले. तर लाखो लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना घडली, असं मलिक म्हणाले. कोट्यवधी लोक रोजगाराला मुकले. काही लोक बेरोजगार झाले. कित्येक लोकांना अर्ध्या पगारावर काम करावे लागले. अर्थव्यवस्था अक्षरशः चौपट आहे. यापेक्षा मोदी सरकारची नाकामी असूच शकत नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.