मुंबई : गेल्या वर्षी २४ सप्टेंबर २०१९ रोजी पुणे शहरामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर अनेक घरांच्या मध्ये व सोसाट्याच्या मध्ये पाणी शिरले होते.तसेच कात्रज तलावातून उगम पावणारा व दत्तवाड येथे मुळा नदी नदीला मिळणारा आंबील ओढा हा अतिक्रमणाने बाधित झालेला आहे.मुठा नदीवरील उजवा कालवा हा फुटून अनेक घरांमध्ये व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा प्रवाह वाहत होता. यामुळे झालेल्या नुकसानीच्या चौकशीची मागणी शिवसेना नेत्या नीलम गोर्हे यांनी केली आहे.
त्यांनी याबाबतचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले आहे . पुणे शहरात त्यावेळी आलेल्या पुरामुळे अरणेश्वर सोसायटी मधील एक भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक घरे पाण्याखाली गेल्यामुळे हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले होते.यासंदर्भात २०१९ च्या पावसाळी अधिवेशन मध्ये मी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधी वरती उत्तर देताना तत्कालीन जलसंपदा राज्यमंत्री श्री विजय शिवतारे यांनी मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची चौकशी समिती नियुक्त करून चौकशी अहवाल डिसेंबर 2019 पूर्वी सादर करण्याचे विधान परिषदमध्ये सांगितले होते. तसेच प्राईमूव्ह संस्थेनेही घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सर्वेक्षण केले होते.
या आपत्तीबाबतची कारणे व त्यावरील उपाय योजनेचा सविस्तर अहवाल पुणे मनपाला ही सादर केला आहे. त्यानुसार रु ३२५ कोटी चा आराखडा तयार करण्यात आलेला असून त्यामध्ये पावसाळी गटारे, सीमाभिंती बंधने, कल्व्हर्ट बंधने, सांडपाणी जलवाहिन्या दुरुस्ती तसेच जवळपास ६ किलोमीटर लांबीची सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती सुचविण्यात आलेली होती. यापैकी गेल्या वर्षभरामध्ये फार कमी कामे पूर्ण झाल्याचे निदर्शनास येत आहे. तथापी गेले वर्षभर याबाबत उपाययोजनेची गती अत्यंत संथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खालील याबात सविस्तर चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधीत जलसंपदा विभाग,जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेस सूचना देणेत याव्यात अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.
प्रमुख मागण्या :
१) तत्कालीन जलसंपदामंत्री श्री विजय शिवतारे यांनी विधान परिषदेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण केलेल्या चौकशी समितीचा अहवाल जाहीर करुन त्यातील सुचना व शिफारशी यांबाबत क्रुती अहवाल संबंधित विभाग व पुणें मनपा यांनी अंमलबजावणी करावी.
2) या चौकशी अहवालानुसार सर्व संबंधित विभागांना कालबद्ध पद्धतीने उपाययोजना करण्या संदर्भात निर्देश दिले होते त्या प्रमाणे कार्यवाही अद्याप का झाली नाही ? याबाबत चौकशी करावी.व आता मनपा अतिक्रमणाच्या नोटीस पाठवल्या जात आहेत.त्या कोणत्या आधारे पाठविल्या जात आहेत.व पुर्वी पुणें मनपाने लोकांना तसे आधीच कळवले असते तर तशी कार्यवाही वेळीच झाली असती.
३) आंबील ओढ्यावरील विविध ठिकाणी असणारी अतिक्रमणे का झाली व महानगरपालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले ? तसेच सदर अतिक्रमित बांधकामे अद्याप पर्यंत का काढली नाहीत ? ती काढण्यासंदर्भात संबंधीत विभागांना सूचित करावे.
४) महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे अपयश का झाले ? तसेच वर्षभर या कामावर त्यांनी का दुर्लक्ष केले ? आपत्ती व्यवस्थापन प्रमुखावर कारवाई होणे आवश्यक आहे.
५) महानगरपालिकाने नैसर्गिक आपत्तीने बाधित होणाऱ्या कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित करण्याच्या हेतूने सुयोग्य नियोजन आराखडा तयार केला आहे का ? याची चौकशी करावी.
६) मुठा उजव्या कॅनलच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत खाजगी बोरवेल्स आहेत. ती कोणाच्या दुर्लक्षाने अथवा आशीर्वादाने पडली ? याबाबत अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केले ?
७) झालेल्या मनुष्यहानी बाबत व आर्थिक नुकसानीला कोण जबाबदार आहे ? त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली ?
वरील विषयाबाबत सविस्तर चौकशी करून आवश्यक कार्यवाही करणेसाठी सर्व संबंधीत विभागांना आवश्यक सूचना देणेत याव्यात ही विनंती.
Read Also :
बातमी राहिली बाजूला,पत्रकारांचीच हाणामारी झाली सुरु |VIDEO|https://t.co/1IPGltMsSw#MUMBAI #NCBNEWS #MarathiNews
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020