मुंबई : केंद्रातील मोदी सरकारला आज सत्तेत येऊन सात वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन छेडणार असून, दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील मोदी सरकारच्या आजपर्यंतच्या कामगिरीवर हल्लबोल केला आहे.
‘मोदी सरकारला आजवरच्या कामगिरीकडे बघता, त्यांना आत्मचिंतानाची गरज आहे. हा देश अजूनही काँग्रेसच्याच पुण्याईवर चालत असून, मोदी सरकारला आणखीन मेहनत करायची गरज आहे,’ असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना केलं आहे.
“सरकारला ७ वर्षे पूर्ण झाली, ही नक्कीच चांगली बाब आहे. यातली २ वर्षे महामारीमध्ये गेली. मात्र, अभ्यास केला तर हेच दिसतं; की पंतप्रधान नेहरुंपासून ते अगदी आत्ताच्या मनमोहन सिंग यांच्यापर्यंत, अजूनही हा देश काँग्रसेच्याच पुण्याईवर चालत आहे. त्यांनी सुरु केलेल्या आणि यशस्वीपणे राबवलेल्या योजनांचा उपभोग आपण आजही घेत आहोत,’ अशी टीका भाजपवर करत, त्यांनी काँग्रेसचे कौतुक केले आहे.
तसेच, “गेल्या ७ वर्षांपासून मोदींचं सरकार असूनदेखील, देशात अनेक कामं प्रलंबित आहेत. देशातल्या नागरिकांच्या फार काही अपेक्षा नाहीत. त्यांना अदानी, अंबानी, टाटा, बिरला व्हायचं नाहीये. मात्र, त्यांचे मूलभूत प्रश्न रोजगार, शिक्षण, उद्योग आणि शेती यांची पूर्तता सरकारने करावी, इतकीच त्यांची अपेक्षा आहे,’ असं म्हणत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराज असल्याचचं अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे.
Read Also :
- ‘सरकारला फक्त अल्टिमेटम देऊ नका! सर्व मराठा संघटनांना एकत्र आणा’
- ‘आरक्षणाला जबाबदार ठाकरे सरकारच, त्यांच्याच अर्ध्या मंत्र्यांना आरक्षण नकोय!’
- ‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा‘
- ‘माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने; आघाडी सरकारला हा बदनाम करण्याचा प्रयत्न’
- पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री