मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत सापडले असून, आत्तापर्यंत या प्रश्नावरून सामंजस्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी देखील ठाकरे सरकारसमोर मांडलेल्या ५ मागण्यांसाठी, सरकारला ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
या पार्श्वभूमीवर, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संभाजीराजेंना सल्ला दिला असून, ‘मराठा आरक्षणावरून संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका ही नक्कीच मराठा समाजाच्या हिताची आहे. मात्र, फक्त राज्य सरकारला अल्टिमेटम देण्यापेक्षा त्यांनी, सगळ्या मराठा संघटनांना एकाच पंखाखाली घेऊन भूमिका मांडण्याची गरज आहे.’ असं म्हटलं आहे.
तसेच, ‘आघाडी सरकार अपयशी ठरलं, त्यामुळे पुन्हा केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. मात्र, असं करून आघाडी सरकार स्वत:चं अपयश झाकण्यासाठीच मोलाचा वेळ खर्ची घालवत असून, सरकारमधले मंत्री जी विधानं करत आहेत. त्यावरुन या सरकारचा हेतू प्रामाणिक आहे असं वाटत नाही. मराठा समाजाने एका व्यासपीठावर एकत्र येऊन, एकत्रितपणे राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे. तेव्हा आरक्षण त्यांच्या पदरात पडेल,’ असं मत देखील त्यांनी यावेळी मांडलं आहे.
Read Also :
- ‘समाज माध्यमांना संपवून लोकांना तुरुंगात डांबण, हा भाजपचा नवीन डाव’
- धनंजय मुंडेंमुळेच माझ्या राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात!
- ‘शिवसेनेला भिवंडीत मोठे खिंडार, बड्या नेत्याने धरली काँग्रेसची वाट’
- ‘आरक्षणाला जबाबदार ठाकरे सरकारच, त्यांच्याच अर्ध्या मंत्र्यांना आरक्षण नकोय!’
- ‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा’