मुंबई : देशात सध्या टूलकिट आणि माध्यम स्वातंत्र्य, तसेच केंद्र सरकारने समाज माध्यमांसाठी लागू केलेल्या नव्या नियमावलीवरून गदारोळ सुरु असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी, भाजपवर टीका केली असून, ‘समाज माध्यमांना संपवून लोकांना तुरुंगात डांबण, हा भाजपचा नवीन डाव,’ असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकरवर केला आहे.
“व्हॉट्सॲप प्रायव्हसीच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल करून, त्या त्यांना शिक्षा करून, लोकांची खाजगी माहिती मिळवण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न असून, हे सगळं गंभीर व धोकादायक आहे. समाज माध्यमांना संपवून लोकांना तुरुंगात डांबण, यासाठीच केंद्र सरकारचा हा खेळ सुरू आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
तसेच, “आज भाजप केंद्रात आहे, सत्तेत आहे. समाज माध्यमांचा वापर करूनच भाजप सत्तेवर आली आहे. आता त्याच समाज माध्यमांवर भाजप अंकुश घालण्याचा प्रयत्न करत असून, या माध्यमातून देशातील जनता केंद्राच्या विरोधात बोलत आहे, आपलं म्हणणं मोठ्याने मांडत आहे. या विरोधी वातावरणाला सरकारला दाबायचे आहे. त्यामुळे त्यांचे हे नवीन धोरण लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचे आहे,” असा हल्लबोल देखील त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘आरक्षणाला जबाबदार ठाकरे सरकारच, त्यांच्याच अर्ध्या मंत्र्यांना आरक्षण नकोय!’
- ‘राज्याच्या राजकारणात आता शिळेपणा आलाय; संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन तो दूर करावा’
- ‘माझ्यावरील आरोप सूडबुद्धीने; आघाडी सरकारला हा बदनाम करण्याचा प्रयत्न’
- पावसाळ्यात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता, काळजी घ्या! – मुख्यमंत्री
- ‘हा आमच्या नाही, फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम!’