मुंबई : ज्या शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना मुख्यमंत्री केलं, पूर्ण हयात सत्ता दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत नारायण राणे यांनी खंजीर खुपसलं. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारायच्या?, हे दुर्दैवी आहे, असा सवाल शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला. माझ्या आयुष्यात आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या भाषणाने, शैलीने, विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली.
मात्र त्याला आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपवाद आहेत. त्यांच्या कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बोलले. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्रीपदाचा भान राखला. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद भूषवण्याच्या लायकीचे नाहीत, असा हल्लाबोल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला. कालच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
मोदींच्या नावावर ५६ आमदार निवडून आणले हिम्मत असेल तर स्वतः च्या नावावर निवडून दाखव, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त १० ते १५ आमदार निवडून येतील असा हल्ला भाजप खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलम ३७० बद्दल बोलतात पण त्यांना कायदा तरी कळतो का? मोदींच्या नाववर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 ही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
कालचा दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
Read Also :
बोरखेडा येथील पीडित कुटुंबियांचे आमदार अमोल मिटकरींनी केलं सांत्वनhttps://t.co/hf4CfGfJZr @amolmitkari22
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020