नाशिक : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून कामे करत असतात. नुकतीच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील त्रयंबकेश्वर तालुका खरशेत गावातील आदिवासी महिलांसाठी एक लोखंडी पूल बांधून दिला आणि त्यांना पाण्यासाठी जी वणवण करावी लागत होती ती काही प्रमाणात कमी झाली.
कर्मचाऱ्यांनो, एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य करू; शरद पवारांचे आवाहन
यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ यांनी आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे आणि काही गोष्टींवरून शिवसेनेवर टीका देखील केली आहे. ज्या गावी पूल बांधण्यात आला तिथं चित्रा वाघ यांनी भेट दिली दिली. यानंतर चित्र वाघ यांनी म्हटलं आहे की खरशेत गावामध्ये बरीचं कामे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी असूनही झालेली नाहीत. आदित्य यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे नक्कीच अभिनंदन. मात्र या साकवला लागून सावरपाड्यात शेती करून माल शेंद्रीपाड्याला विकला जातो. हा २ किलोमीटरचा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. तो जर बनला तर ग्रामस्थांना त्यांच्या कष्टाचे २ पैसे मिळू शकतील.
त्रंबकेश्वर तालुका खरशेत गावी भेट दिली… महिलांना पाणी आणायला तास नदीचं पात्र बांबूवरून क्रॉस करून जावं लागल्याचा फोटो प्रसिद्ध झाला
तिथले लोकप्रतिनीधी शिवसेनेचेचं हा वर्षानुवर्ष चा प्रश्न सोडवू शकले नाही ज्याची दखल दस्तुरखुद्द @AUThackeray नी घेतली व प्रश्न २ दिवसात सुटला(१/४) pic.twitter.com/BoAOv6Xzci— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 10, 2022
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खावटी अनुदान देण्याचा शासन निर्णय झाला. ज्यात ११ लाख ५० हजार लाभार्थी येतात. पण पुर्ण कागदपत्र देऊनही अद्याप ५०% लाभार्थी अनुदानापासून वंचीत आहेत. १७०० लोकांची यादी तर माझ्याकडे आहे. वांरवार पाठपुरावा करूनही अनुदान नाहीचं अशी एकंदरीत परिस्थिती आहे. २०२१ मधील बरीच कामे प्रस्तावीत आहेत पण अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही.पोषणआहार बालकांना मातांना कुणाला पोहोचतो तर कुणाला नाही. आपण स्वत: यात लक्ष घातलं तर आपले लोकप्रतिनीधी यात काम करतील ज्यांच्या प्रतिक्षेत आजही खरशेत व परीसरातील लोक आहेत, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
Read also:
- मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी गिरीश महाजन अडचणीत; पोलिसांना सापडली टेम्पोभर कागदपत्रे
- शिवसेना माघार घेणार नाही, त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन तुम्ही मोठ्या मनाचे व्हा; आठवलेंचा सल्ला
- .यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील – गुणरत्न सदावर्ते
- गुणरत्न सदावर्ते हेच आमचे मालक, कृती समितीशी आम्हाला देणं-घेणं नाही – एसटी कर्मचारी
- गुणरत्न सदावर्तेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची रोजी-रोटी बंद होण्याची वेळ; कृती समितीचा आरोप