नवी दिल्ली : शेतकऱ्यांनो, तुम्ही एक इंचही मागे हटू नका. या आंदोलनावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करू, असे आवाहन करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मात्र राहुल गांधींनी शेतकऱ्यांना मागे न हटण्याचे केलेल्या आवाहानानंतर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलनात हिंसेचं रुप आल्यानंतर अनेक पोलीस, मीडियाकर्मी जखमी झाले. मात्र, त्यांच्याप्रती गांधींनी एकही सहानुभूतीचा शब्द वापरला नाही, अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.
ट्रॅक्टर परेडमध्ये जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत संवेदना न व्यक्त केल्याबद्दल देखील इराणींनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी देश तोडण्याची भाषा केली आहे. राहुल गांधी यांनी म्हटलंय की, 26 जानेवारीला जो हिंसा दिल्लीत बघायला मिळाली तसाच हिंसा देशातील इतर भागांमध्ये जनता बघेल. मी देशाला विनंती करते, राहुल गांधींच्या या इच्छेला आपण सर्व मिळून अपयशी ठरवूस असे इराणी म्हणाल्या.
भारताच्या राजकारणात पहिल्या एखाद्या नेत्याने शांततेचे आवाहन करण्याऐवजी अराजकत्तव देशात कशी आग लावतील, त्याचे आवाहन करताना दिसले, असे घणाघात स्मृती इराणींनी राहुल गांधींवर केला.
Read Also :
- शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
- महाविद्यालय सुरू करण्याच्या मुद्यावरून राज्यपाल-ठाकरे सरकार आमनेसामने?
- ‘काकां’मुळे सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय लागली – अजित पवार
- ‘मतांसाठी राजीव, इंदिरा गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने…’ राममंदिराच्या निधीवर भाजपचे प्रत्युत्तर
- शिक्षण खात्यात ‘या’ पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी, शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा