रायगड: कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. प्रशासन म्हणून आपण काय खबदारी घेतील आहे, असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना विचारला आहे.
हे पण वाचा: ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार
आमदार भास्कर जाधव मंत्र्यासमोरच अधिकाऱ्यांची कानउघडी केली आहे. ऐरवी सायरन लावून फिरणारे पोलीस कोठे गेले होते, का सायरन लावून रस्त्याने लोकांना सुचना दिल्या नाहीत. अचानक सकाळी तीन वाजता शहात पाणी शिरल्याने नागरिकांनी काही करता आले नाही. परंतू नियमित महापालिकेचा सारयन वाजतो त्या दिवशी का वाजला नाही अशा शब्दात भास्कर जाधव यांनी कानउघडणी केली आहे.
हे पण वाचा: “कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
शहात पाणी शिरल्याचे प्रकार याआधी सुद्धा झाले आहेत. नवीन गोष्ट नाही आता बैठका कशासाठी याआधी का काही करता आले नाही. आपण याआधी सुद्धा यावर बैठका घेतल्या आहेत, मग आता कशासाठी हे, का अधिकाऱ्याला नियोजन करता आले नाही. येथे बसून काय करता तुम्ही, वसूली यंत्रणा कधि पंचनामे करणार आहे, व्यापाऱ्याने कधि दुकाने चालू करायची आहेत. हा कुठला नियम आहे, व्हिडीओ शुटीग काढून व्याऱ्याला त्यांची दुकाने चालू करु द्यावी.
हे पण वाचा: राज्यातल्या भाजपच्या “या” मोठ्या नेत्याचा, झारखंड सरकार पाडण्याच्या कटात हात!
प्रशासनाची कमा आहे ना साहेब, ज्या ठिकाणी कामे पाणी शिरते सर्वांत आधी पाणी जिथे साचते त्या ठिकाणी तुम्ही होड्या ठेवता, त्या कश्या काढायच्या आहे होत्या, दुसऱ्या जागेवर का ठेवता आल्या नाहीत. अशा परिस्थीत कुठे तुमच मॅनेजमेंट का नागरिकांचे हाल झाले. पोलीस प्रशासनाचे कुच कामी धोरण बघायला मिळाले आहे. कुठल्याच पद्धतीचे कोणाचे मॅनेजमेंट होत, असा सवाल त्यांनी विचारला आहे.