मुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचा कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. या तीनही आरोपींनी याबाबत धक्कादायक खुलासा पोलिसांकडे केला असून, या कटात झारखंडचे ३ आमदार, २ पत्रकार आणि काही मध्यस्थांचा समावेश होता, अशी माहिती या आरोपींनी दिली आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
“कुठेही गेलं तर जनतेचं ऐकून घ्यायचं असतं”, राष्ट्रवादीकडून शिवसेनेला घरचा आहेर
दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीने महाराष्ट्र भाजपच्या एका मोठ्या नेत्यावर गंभीर आरोप केला असून, सरकार पाडण्यासाठी एक कोटींची डील झाली होती आणि या डीलमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश होता, अशी कबुली या आरोपींनी दिली आहे,” असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र
मात्र, बावनकुळे यांनी, “आपण कधीही झारखंडला गेलो नाही. तिथलं सरकार पडण्याची आपली लायकी नाही,” असा दावा करत हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, या डीलमध्ये भाजपचा महाराष्ट्राचा एक आमदार असल्याच्या आरोपींच्या वृत्ताला, दैनिक हिंदुस्ताननंही दुजोरा दिला आहे. मात्र, बावनकुळे हे आमदाराच नसल्याने त्यांचा या प्रकरणात हात नसावा, असंही सांगितलं जात आहे.
‘त्या’ प्रकरणावर मुख्यमंत्री बोलले, भास्कर जाधवांना दिला कानमंत्र
पोलिसांनी अटक केलेल्या ३ आरोपींपैकी दोघे सरकारी कर्मचारी आहेत, तर एक जण दारूचा व्यवसाय करतो. पोलिसांनी रांचीच्या एका हॉटेलमधून या तिघांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या तिंघांविरोधात भादंवि कलम ४१९, ४२०, १२४ अ, १२० ब, ३४ आणि पीआर ऍक्ट १७१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Read Also :
- सातव कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण, राहुल गांधींची भेट घेऊन केला आनंद द्विगुणित
- फडणवीसांचे भास्कर जाधवांना शालीतून जोडे, तर महाविकास सरकारला मोलाचा सल्ला
- राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार
- खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?