रत्नागिरी : काल मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर असताना, , एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला असता, आमदार जाधवांनी कुत्सितपणे हसत, “तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली.
सातव कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण, राहुल गांधींची भेट घेऊन केला आनंद द्विगुणित
तसेच, अजून एका घटनेत त्यांनी, मुख्यमंत्र्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर थेट हात उगारला. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. दरम्यान, यावर आता भास्कर जाधवांनी एक मोठा खुलासा केला असून, यावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली, हे त्यांनी सांगितले आहे.
फडणवीसांचे भास्कर जाधवांना शालीतून जोडे, तर महाविकास सरकारला मोलाचा सल्ला
“भोजने आणि आमचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. कालच्या माझ्यावर झालेल्या आरोपानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मला मुंबईला पोहोचेपर्यंत ५-६ फोन येऊन गेले. ते म्हणाले, बदनामीला घाबरू नकोस, आपल्या मधल्या शिवसैनिकाला मरु देऊ नकोस, असं त्यांनी मला सांगितलं. तू पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा, असा सल्ला देखील त्यांनी मला दिला,” असा खुलासा त्यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार
दुसरीकडे महिलेनेही या शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केली नाही. त्यांचा आवाजच तसा आहे,” असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. त्यामुळे, या प्रकरणाला आवरतं घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र अजून एका व्हिडीओत, मुख्यमंत्र्यांसमोरच आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर त्यांनी, थेट हात उगारल्याचे दिसत आहे. यावर अजूनही सत्तेतील आणि शिवसेनेतील एकाही नेत्याने भाष्य केले नसून, ही महिला देखील त्यांच्या मुलीसारखीच होती आणि म्हणूनच त्यांनी हे कृत्य केलं का? जनतेप्रती लोकप्रतिनिधींचं असणारं हे कसलं प्रेम? असा प्रश्न पडत आहे.
Read Also :
- खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
- “चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन
- राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?
- ‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…
- सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द