चिपळूण : अतिवृष्टीने बाधित झालेल्या आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेल्या चिपळूणचा ४ दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. यावेळी त्यांनी पुरामुळे उध्वस्त झालेल्या लोकांच्या भावना, व्यथा, प्रश्न ऐकून घेतले, जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, परिवहन मंत्री अनिल परब होते.
हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, चिपळूणमधल्या सर्वाधिक नुकसान झालेल्या बाजारपेठेतल्या, एका गल्लीत हा ताफा आला असताना, एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला असता, आमदार जाधवांनी कुत्सितपणे हसत त्या महिलेला, “५-६ महिन्याचा दिला तरी आता काही होणार नाही. तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली.
भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
यांनतर त्यांच्यावर समाज माध्यमांवरून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. तसेच विरोधकांनी देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, या घटनेवर आता त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, “मला यावर काही बोलायचं नाही. लोकांना मदत करणं याला मी प्राधान्य देतो. कालही मी तेच केले. ती महिला माझ्या मुलीसारखी होती,” असं ते म्हणाले आहेत, तर दुसरीकडे महिलेनेही या शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अरेरावी केली नाही. त्यांचा आवाजच तसा आहे,” असे सांगत आपले मौन सोडले आहे.
राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका
त्यामुळे, या प्रकरणाला आवरतं घेण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याचं सध्यातरी दिसून येत आहे. मात्र अजून एका व्हिडीओत, मुख्यमंत्र्यांसमोरच आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर त्यांनी, थेट हात उगारल्याचे दिसत आहे. यावर अजूनही सत्तेतील आणि शिवसेनेतील एकाही नेत्याने भाष्य केले नसून, ही महिला देखील त्यांच्या मुलीसारखीच होती आणि म्हणूनच त्यांनी हे कृत्य केलं का? जनतेप्रती लोकप्रतिनिधींचं असणारं हे कसलं प्रेम? असा प्रश्न पडत आहे.
Read Also :
- सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द
- कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव
- ब्रेकिंग! कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांचा राजीनामा, भावुक होत केले मोठे विधान!
- भास्कर जाधवांच्या महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी नंतर, संजय राऊत म्हणतात….
- ५ दिवसांनंतर तळीयेतील सर्च ऑपरेशन अखेर थांबलं, बेपत्तांना मृत घोषित करा! ग्रामस्थांची मागणी