महाड : तब्ब्ल ५ दिवसानंतर अखेर महाडच्या तळीयेतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं असून, या दुर्घटनेत जेवढे लोक अजूनही बेपत्ता आहेत, त्या सर्वांना मृत घोषित करा, अशी मागणी काळजावर दगड ठेऊन तळीयेच्या ग्रामस्थांनी केली आहे. तसेच, “आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, त्याशिवया आम्हाला लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे.
काय घडलं होतं तळीये मध्ये?…
कोकण प्रदेशांत झालेल्या अतिवृष्टीमुळे, डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या तळीये या गावावर, गुरुवारी सं. ४ वाजता डोंगराचा मोठा भाग खचून कोसळला, या दरडीखाली ३५ घरे दाबली गेली. दरम्यान, घटना घडताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. त्यांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून ३२ जणांचे मृतदेह बाहेर काढले. मात्र, तरीही ८०-९० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”
दरम्यान, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथकं गेल्या ५ दिवसांपासून या ठिकाणी सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन करत होती. गेल्या ५ दिवसांपासून दरडीचा ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरू होतं. यात टीमच्या हाती कालपर्यंत आणखीन ११ मृतदेह हाती लागले. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५३ वर गेली. तरीही अजूनही ३२ नागरिक बेपत्ता आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
मात्र, आजच्या दिवशी टीम्सनी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केल्यानंतर, दोन तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना गराडा घालत, “तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन थांबवा. आमचा आक्षेप नाहीये. मात्र, जे बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करा,” अशी मागणी केली. त्यामुळे आता हे रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे.
काय अडचणी ?
मुसळधार पाऊस असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा येत होता. पावसामुळे सगळीकडे चिखल झाल्याने टीम्सना शोधकार्यात अडथळे येत होते.
माझ्या जनतेवर दुःखाचा डोंगर, जन्मदिन साजरा करू नका; वाढदिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मदत किती लवकर मिळणार?…
या घटनेनंतर मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय नेते आणि दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनीही या भागाचा दौरा केला. राज्याकडून आर्थिक मदत आणि म्हाडाकडून घरे बांधून देऊन, पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, तर केंद्राकडूनही आर्थिक मदत आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यास मदत करण्यात येईल, असे सांगितले गेले आहे.
मुख्यमंत्री पाहुणे आहेत का?, नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले
मात्र, आता ही मदत दुर्घटनाग्रस्तांना किती लवकर मिळणार हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, एवढी मोठी घटना घडूनही प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे, प्रशासनाच्या या दिरंगाईवर ५ दिवसांनंतरही अजूनही कोणतीही कठोर कारवाई का करण्यात आलेली नाही? असा अवलं उपस्थित होत आहे.
Read Also :
- सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत, प्रीतम मुंडेकडून मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- पुण्यातील होर्डींग युद्ध सुरूच; भाजप- राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेची चमकोगिरी
- पुणे महानगर नियोजन समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
- भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
- राज्याला मुख्यमंत्रीही नाही आणि प्रशासनही नाही, राणेंची बोचरी टीका