मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना आज भेट देणार आहेत. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची ते पाहणी करतील. तर महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीलाही मुख्यमंत्री भेट देणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतो आहे. पाटण तालुक्यात भूस्खलन झाले आहे. तर मौजे आंबेघर आणि मौजे मिरगाव या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडल्या आहेत.
हे पण वाचा: दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
दुर्घटनाग्रस्त भागांची पाहणी करून मुख्यमंत्री कोयनानगर हेलिपॅडवर येतील. कोयना नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीला भेट देतील. तसंच या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांची विचारपूस करून त्यांच्याशी संवाद साधतील. दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोयनानगर या ठिकाणी पत्रकार परिषदही होणार आहे. नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने पुण्याला रवाना होतील.
हे पण वाचा: भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आणि शनिवारीही पूरग्रस्त भागांमध्ये दौरे केले. तिथल्या नागरिकांना त्यांनी दिलासाही देण्याचं काम केलं. तुम्ही काळजी करू नका सरकार तुमच्या पाठिशी आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच सर्वतोपरी मदत करण्याचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरड कोसळून आणि भूस्खलन होऊन ज्या घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत. त्या मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणखी काही महत्त्वाची घोषणा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा: हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
दोन दिवसांपासून काहीशी उसंत पावसाने घेतली असली तरी त्याआधी पावसाने राज्यात थैमान माजवलं. कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी तर पावसाने कहर माजवला. अगदी त्याच प्रमाणे कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणीही पावसाचा जोर कायम होता. आता परिस्थिती काहीशी आटोक्यात येते आहे. मात्र पूर, भूस्खलन, दरड कोसळण्याच्या घटना या सगळ्यामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना स्थलांतरित करावं लागलं आहे. एकीकडे कोरोनाचं संकट संपलेलं नसताना आता राज्यावर हे आस्मानी संकट येऊन कोसळलं आहे. या संकटातून वाट काढण्याचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत.
Read Also :
- महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे करोनामुळे निधन
- मुख्यमंत्री पाहुणे आहेत का?, नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यावर संतापले
- नारायण राणे हे ज्या पक्षात आहेत, तो पक्ष पोथीपुराणावर चालणारा पक्ष, महाराष्ट्रात अशा गोष्टींना थारा नाही
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट