चिपळूण: रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या परिस्थितीची पाहणी काल केंद्रिय मंत्री नारायण राणे केली. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते होते.
हे पण वाचा: नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली.
हे पण वाचा: आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आमचं सर्व काही पुरात वाहून गेलं आहे. आमचं कंबरडं मोडलं आहे. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्राज जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो, असं या व्यापाऱ्यांनी राणेंना सांगितलं.
हे पण वाचा: काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती सर्व मदत करावी! नाना पटोले
आम्ही पाहायला आलो नाही
चिपळूमधील माणसं आमची असून आमच्या घरातली माणसं आहेत. त्यांच्या घरात पुन्हा पाणी शिरणार नाही याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. आम्ही नुसतं पाहयाला आलो नाही आमच्या घरातली माणसं आहेत. माणसं बेघर झाली असून त्यांना मदत आणि दिलासा देण्यासाठी आलो आहे. यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे ठरवले आहे. मदत करणं आमचं कर्तव्य आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही
इथलं प्रशासन बेजबाबदार आहे. त्यांना नियामांची, प्रोटोकॉलची माहिती नाही. बाजारपेठेत आल्यावर एकही अधिकारी येऊन भेटले नाहीत. अॅडिशन कमिश्नर, प्रांत अधिकारी कार्यालयात बसून आहेत दोन विरोधी पक्षनेते, एक केंद्रीय मंत्री चिपळूणमध्ये आले असूनही ते भेटायला आले नाही. हा अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा आहे आणि त्याबद्दल योग्य ती कारवाई केल्याशिवाय माझ्यासारखा माणूस गप्प बसणार नाही.
हे पण वाचा: महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट
केंद्रीय विभागात कारवाई केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे अधिकारी खुर्चीवर आमच्या विभागात राहता कामा नये लोकं रडत आहेत आणि अधिकारी मुख्यमंत्र्यांना पोहचवायला गेले आहेत. मुख्यमंत्री पाहुणे आहेत का? त्यांचे कामच आहे. अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
- एकदा शेतकऱ्यांच्या धर्तीवर कर्जमाफी द्या, पुन्हा कधीच भीक मागणार नाही! जगण्यासाठी त्यांनी जोडले हात
- “आमचे आई-वडील तुम्ही आहात, आम्हला काहीही करून जगवा…” चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांसमोर फोडला टाहो!