मुंबई: राज्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईसह कोकण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पूर परिस्थितीमुळे ज्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली.
हे पण वाचा: संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सुरु असलेल्या परीक्षेकरिता जे विद्यार्थी अतिवृष्टीमुळे परीक्षेला बसू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांकरीता सुरु असलेल्या परीक्षा संपल्यानंतर (३/८/२०२१ नंतर) फेर परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
— Uday Samant (@samant_uday) July 24, 2021
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी देण्यात यावी, असे आदेश धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संचालकांना दिले आहेत. जेईई मेन २०२१ सत्र ३ च्या परीक्षेला प्रविष्ट होण्याची संधी पुन्हा एकदा देण्यात यावी, असं प्रधान म्हणाले. कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी २५ ते २७ जुलै दरम्यान होणाऱ्या जेईई मेन जुलै सत्र ३ परीक्षेला पोहोचू शकणार नाहीत त्यांनी चिंता करु नये. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा एक संधी देण्यात येईल. परीक्षेच्या तारखा पुन्हा एकदा जाहीर करण्यात येतील.
हे पण वाचा: ‘कृष्णकुंज’वर एकाच मागणीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी, राज ठाकरे लवकरच घेणार मोठा निर्णय!
राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून थैमान घालणाऱ्या महापुरात आतापर्यंत ७६ जणांचा बळी गेला आहे. एकूण ५९ लोक बेपत्ता झाले असून ७५ जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीनंतर घडलेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे पण वाचा: ‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली.
Read Also :
- नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार