मुंबई: कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रिय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या संमतीने कोकणचा दौरा करतोय. फडणवीस-दरेकर साथीला असणार आहेत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
हे पण वाचा: उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
उद्धव ठाकरे-राणे-फडणवीस-दरेकर एकाच वेळी चिपळूणमध्ये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणच्या दौऱ्यावर जाणार असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणेही आज कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. राणेंच्या मंत्रालयाकडून तसा कार्यक्रमा जाहीर करण्यात आला आहे. नारायण राणे काल रात्री ८.५० वाजता दिल्लीवरुन मुंबईला आले. त्यानंतर सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने तळई गावची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. दुपारी १२ वाजता रायगडवरुन रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नुकसानाची पाहणी ते करणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता ते खेडवरुन चिपळूणला पोहोचतील आणि पुढे रत्नागिरीकडे रवाना होतील. यावेळी राणे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही असणार आहेत.
हे पण वाचा: संयमाचा अंत पाहू नका, भाजपचे बोरिवली स्थानकाबाहेर घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्यासह रायगड जिल्ह्यातील तळये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत.@PMOIndia
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 25, 2021
रामदास आठवलेही महाड दौऱ्यावर
तर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही आज तळई गावाला भेट देणार आहेत. तशी माहिती आठवले यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आज राज्यातील ४ मोठे आणि महत्वाचे नेते कोकणच्या पाहणी दौऱ्यावर असणार आहेत.
हे पण वाचा: उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
चिपळूनमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण परिसर जलमय झाला. सर्वदूर पाणी साचल्याने तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचे पाणी शहरातील अनेक भागात पाणी साचले त्यामुळे अंतर्गत मार्ग बंद झाले होते. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या होत्या. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत झाले.
Read Also :
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, पूर परिस्थितीची करणार पाहणी
- “हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं”
- उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
- आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड