मुंबई : राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. काही प्रमाणात का होईना राज्य आणि केंद्र सरकारने आपली जबाबदारी ओळखून, हातात हात घालून काम केल्याने, राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. तसेच, लसीकरण आणि निर्बंध यांमुळे देखील हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
खडसे सोडून गेल्याने भाजपला काही एक फरक पडत नाही! भाजपच्या नेत्याचे मोठे विधान
या पार्श्वभूमीवर, मुंबईत सर्वसामान्यांसाठी अजूनही लोकल प्रवासावर बंदी आहे. मात्र नागरिक आता बाहेर पडत असून, लोकल बंद असल्याने मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे, हा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी लोकांकडून लोकलवर असणारी बंदी हटवण्याची मागणी होत असून, लसीचे दोन डस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात यावी या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं.
याबाबत निर्णय झाला नाही, तर रेल रोकोचा इशारा यावेळी दिला आहे.
प्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे, आमदार मनिषाताई चौधरी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, श्री. प्रकाश दरेकर, विनोद शेलार यांच्यासह नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 24, 2021
महापालिका रणधुमाळी : भाजपची पुण्यनगरी कोणाकडे? नेतृत्वाच्या संभ्रमात कार्यकर्ते नाराज
यावेळी, “संयमाचा अंत पाहू नका. दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या. पत्र लिहून देखील सरकारने दाद दिली नाही. लोकांकडे कोविड काळात काम नाही. रोज ७००-८०० रुपये खर्च येत आहे. कामावर नाही गेलं तर नोकरी धोक्यात येत आहे. सर्व सामान्य माणसाने एवढा पैसा आणायचा कुठून? असा सवाल दरेकर यांनी केला.
मुख्यमंत्री ठाकरे तळीये गावात दाखल, दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार
तसेच, “मुख्यमंत्री अहंकारापोटी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेत नसून, हे सरकार निष्क्रिय आणि उदासीन आहे,” असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला. बोरिवली स्थानकाबाहेर भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केले गेले. यावेळी आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा प्रमाणावर होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लोकल सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच, अनेक पक्षांनी रेल्वे सुरू करणायाची मागणी केली आहे.
Read Also :
- मुंबई महापालिकेत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने खेळली ‘राणे’नीती
- नागरिकांनो स्वत:ला सांभाळा, तातडीने पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
- आणखी एक थरारक घटना; रायगड किल्ल्याजवळच्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
- ‘कर्जत-जामखेडमध्ये फिल्डिंग करणारेही पाहिले अन् मॅच फिक्सिंग करणारेही; रोहित पवारांची फटाकेबाजी
- महाविकास आघाडीकडून पूरग्रस्त भागांत मदतीचा ओघ सुरु, राज्यावर अजूनही अतिवृष्टीचे महासंकट