जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसींच्या सर्व प्रकारच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, राज्यातील ओबीसी समाजात मोठा प्रक्षोभ उसळला. महाविकास आघाडी सरकारला, हे आरक्षण पुन्हा मिळवून देण्यात स्वारस्य नाही, आरक्षण मिळवून देण्यावरून राज्य सरकार वेळ दवडत आहे, असा आरोप करत विरोधी पक्षाने सत्तेतील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले.
हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
दुसरीकडे, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपवर हल्लाबोल करत, “भाजप हा ओबीसी विरोधी पक्ष आहे. पक्षातील ओबीसी नेत्यांना, पक्षातीलच इतर नेत्यांकडून योग्य तो मान-सन्मान कधी मिळाला नाही,” अशी जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेच्या मागे पार्श्वभूमी होती, ती भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांची आणि मुंडे भगिनींची. स्वतः एकनाथ खडसे यांनी देखील पक्षाला सोडचिट्ठी देताना अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते.
नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
दरम्यान, काल एकनाथ खडसेंच्या होम ग्राउंडवर अर्थात जळगावमध्ये, भाजपच्या २५ लाख युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे आले असताना, सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, ओबीसी आणि बहुजन समाजाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर होणाऱ्या आरोपांबाबत बावनकुळे यांना विचारले असता, त्यांनी खडसेंवर जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला
“भाजप हा नेत्यांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष असून, खडसे काय किंवा आणखीन कोणी, त्यांच्या पक्ष सोडून जाण्याने भाजपला फरक पडत नाही. भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये ६०% मंत्री ओबीसी होते. आजच्या आणि तत्कालीन फडणवीस सरकारची तुलना केल्यावर हा फरक लगेच लक्षात येईल. खडसे, मी स्वतः, तसेच पंकजा मुंडे आम्हाला सगळ्यांना पक्षाने भरपूर संधी दिल्या आहेत. त्यामुळे पक्षाने अन्याय केला हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे,” असं ते म्हणाले.
दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे
तसेच, “वैयक्तिक त्यांच्याबाबतीत एखादा विषय झाला असेल, काही प्रसंग घडला असेल, तर त्यामुळे पक्ष चुकीचा ठरत नाही. त्यांच्या जाण्याने पक्षाचे काहीही नुकसान झालेले नाही आणि ज्याची आस ते धरून होते, ते मंत्रिपद देखील इतके दिवस झाले, तरी राष्ट्रवादीने खडसे यांना दिले नाही. त्यांना लटकवून ठेवले आहे,” असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.
Read Also :
- नवी मुंबईतील कंत्राटी कामगारांचा कोव्हिड भत्ता रखडला: महापालिकेने मागितली आणखी ७ दिवसांची मुदतवाढ
- मन सुन्न करणारी घटना! एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आख्खं गाव स्मशानात बदललं, ४० मृतदेह एका रांगेत
- जनता पुरात, पालकमंत्री रात्रीत मुंबईत, “हे पालकमंत्री नव्हे, हे तर पळपुटे मंत्री”
- महाराष्ट्रात पावसाचा कहर, पूरग्रस्त भागातील रुग्णांसाठी आरोग्य मंत्र्यांनी केली मोठी घोषणा
- राज्यात पावसाचे थैमान, आता पर्यंत १३६ बळी, ६ जिल्ह्यांत रेड अलर्ट