मुंबई: कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे पण वाचा: “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”
केंद्र सरकारने या आस्मानी संकटात मदत करावी यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रात पावसाचा कहर कसा माजला आहे, पूरस्थिती कशी निर्माण झाली आहे याची माहिती अमित शाह यांना या तिघांनी दिली. सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातली माहिती ट्विट करून दिली आहे.
Met Union Home Minister Hon. @AmitShah Ji regarding the Flood Situation in Maharashtra along with @ShivSena Rajya Sabha Members of Parliament- Hon. Anil Desai Ji and Priyanka Chaturvedi (@priyankac19
).
Thank you Hon. Amit Shah Ji for your time and assuring help for Maharashtra. pic.twitter.com/U8Pe2MbKMg— Supriya Sule (@supriya_sule) July 23, 2021
हे पण वाचा: २ दिवसांत तब्ब्ल १२९ मृत्यू, राज्यात पावसाने दाखवला आपला रुद्रावतार; आकडा वाढण्याची भीती
अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन
महाराष्ट्रातील रायगडमध्ये पावसाचा कहर आणि भूस्खलन यामुळे झालेली दुर्घटना ही अत्यंत दुःखद आहे. यासंबंधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. तसंच DG NDRF लाही संपर्क साधला. NDRF ची पथकं मदत आणि बचाकार्य करत आहेत. केंद्र सरकार या ठिकाणी संकटात सापडलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे.
हे पण वाचा: तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांचे शिक्षण व्हावे, यासाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
अजित पवारांचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांना फोन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. त्यांना महाराष्ट्रातील सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव आणि मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
Read Also :
- नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
- हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
- “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”
- तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने
- अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…