कोल्हापूर: कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे पण वाचा: तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने
खासदार संभाजीराजे यांनी ट्टिट करत म्हणाले की, चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास महाराष्ट्र पूरस्थिती मदतकार्यासाठी तैनात होण्याचे व सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास महाराष्ट्र पूरस्थिती मदतकार्यासाठी तैनात होण्याचे व सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत
CDS General Bipin Rawat has instructed the Navy to help with Flood relief work in Maharashtra, on behest of my request
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 23, 2021
हे पण वाचा: रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.
हे पण वाचा: “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”
चिपळूणच्या गोवळकोट गावात पाणी ओसरायला सुरुवात
चिपळूणच्या गोवळकोट गावात पाणी ओसरायला सुरुवात, गोवळकोट येथे पुराचे पाणी कमी होऊन रोडच्या खाली आलं आहे. काल घरे आणि मंदिरे पुराच्या पाण्यात होती. मात्र आता पाणी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. गावातील सर्व मंडळी सुरक्षित आहेत. दोन घरांचे नुकसान झाले आहे. चिपळूण बाजार पेठमध्ये अजून पाणी, गावकऱ्यांकडून मदत कार्य सुरु, कोणतीही काळजी करू नये, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.
हे पण वाचा: २ दिवसांत तब्ब्ल १२९ मृत्यू, राज्यात पावसाने दाखवला आपला रुद्रावतार; आकडा वाढण्याची भीती
रायगडमधील तळई गावात मोठी दुर्घटना, दरड कोसळून तब्बल ३२ जणांचा
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे ३५ घरांवर दरड कोसळली असून ८० ते ८५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर कडून बचावकार्य सुरु आहे.
Read Also :
- हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
- “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”
- तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने
- अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन; घेतला आढावा