कोकण : महाराष्ट्रात तुफान पावसाने हाहा:कार उडवला आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावात दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. आतापर्यंत तळीये दुर्घटनेत 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर साताऱ्यातील आंबेघर इथे दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक संसांर उद्धस्त झालेल्यांचा नेमका काय दोष होत?, हे देवा तुच सांग… अशी टाहो अवघ्या महाराष्ट्रातून फोडली जात आहे.
हे देवा तु सांग ना….कुठं गेला हरवूनी….
लेकराची आण तुला… आवतर आता तरी….
रायगड पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडी येथे भूस्खलन झाले आहेत. यामध्ये दरडीखाली 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याआधी महाड तालुक्यातील तळीये गावात भूस्खल होऊन आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिकडे साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तिन्ही घटनांतील मृतांचा आकडा आता 89 वर गेला आहे.
अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं…
उर जळून निघालं… बघं करपलं रानं…
कुठे किती मृत्यू?
चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू
तळीये, महाड – 38 मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – १२ जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
पोसरे, रत्नागिरी – 17 जणांचा मृत्यू
कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू
आता तरी बघं देवा… उंबऱ्यात मी उभा…
रित तुझ्या दानव्याला… माझा कायं रं गुन्हा…
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक सहा वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे येथे दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यापैकी तीन ठिकाणी जिवीतहानी झाल्याची माहिती आहे. आंबेघर गावात तर प्रचंड भयानक घटना घडलीय. आंबेघर गावातील तब्बल 14 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मिरगावात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फक्त पाटण तालुक्यात 26 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कोंडवळी आणि मोजेझोर इथेही दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही ठिकाणातील दुर्घटनेत आतापर्यंत एकूण दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Read Also :
- जयंत पाटलांचं सांगलीकरांना कळकळीचं आवाहन! मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन तातडीने स्थलांतरीत व्हा!
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश
- रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
- महाड येथील बचावकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरु आहे अडकलेल्यांची सुटका
- राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे