कोकण : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत झालेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
यातच आता रायगडमध्ये या अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली असून, महाड तालुक्यातील तळई गावात ३५ घरांवर दरड कोसळून तब्बल 3६ जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे, तर सुमारे आणखीन ८०-९० लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काल संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेतील ३२ लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.
कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू- रावसाहेब दानवे
या घटनेनंतर, स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, मातीच्या ढिगाऱ्याखालून सर्व ३२ लोकांचे मृतदेह बाजूला काढले आहेत. परंतु, “पावसामुळे पुढील मदत कार्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे, इथे येणारे सर्व रस्ते बंद होते. तसेच, हेलिकॉप्ट देखील संध्याकाळनंतर इथे पोहोचणे शक्य नव्हते. मात्र, आज सकाळी पावसाने उसंत घेतल्यानंतर एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे बचावकार्य पुन्हा सुरु करण्यात आली आहे,” अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, लसीकरण करणार जलद गतीने
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि निलंबित आमदार गिरीश महाजन हे गेल्या ३-४ तासांपासून घटनास्थळी दाखल असून, काल दुपारी ही घटना घडल्यानंतर, १९ तासांनंतरही इथे प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोहोचला नाही. त्यामुळे, प्रशासन झोपलं आहे का?, विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
कोकणात पूरस्थिती गंभीर, उपासमारीने लोकांचे हाल, पिण्यासाठी एक थेंबही पाणी नाही
तसेच, “ही घटना मोठी आणि दुर्देवी असल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून हेलिकॉप्टर मागवण्याची मागणी केली आहे,” अशी माहिती देखील त्यांनी यावली दिली आहे, तर “एवढं निगरगट्ट प्रशासन मी माझ्या आयुष्यात पाहिलं नाही,” अशी टीका गिरीश महाजन यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी देखील प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही,, अशी तक्रार केली आहे.
पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्रातील पूर परिस्थिचा घेतला आढावा
दरम्यान, सरकारकडून या दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्यात येणार का? दुर्घटेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार का? इतर पक्षाचे नेते घटनास्थळी दाखल होऊ शकतात, पण प्रशासनाला यायला १९ तास का लागले? प्रशासन आणि यंत्रणेकडून ही दिरंगाई का झाली?, असे सवाल या घटनेमुळे उपस्थित होत आहेत.
Read Also :
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी