मुंबई: कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोकणाला मदत करण्याचं आश्वासन दिलंय. मोदींनी फोन करुन राज्यातील पूरस्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर केंद्र सरकार महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासनही पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2021
यावेळी नरेंद्र मोदी यांनी या चर्चेची माहिती मराठीत ट्विट करुन दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्रातल्या काही भागातला पूर आणि मुसळधार पाऊस याबाबत चर्चा केली. या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आणि सुखरूपतेसाठी प्रार्थना करीत आहे.”
हे पण वाचा: “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
सिंधुदुर्ग जिल्हाला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज सकाळी पासून सिंधुदुर्ग जिल्हात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. कुडाळ तालुक्यातील आबेंरी पुलावर पाणी आले असून हे पूल पाण्याखाली गेले आहे. यामुळे माणगाव खोरातील २७ गावांचा संपर्क तुटला आहे. तर सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पुलावर पाणी आले आहे. शिरशींगे गावात जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या गावाचा सावंतवाडीशी देखील संपर्क तुटला आहे.
हे पण वाचा: कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
चिपळूणमध्ये गुरुवारी भीषण परिस्थिती
पुढील काही तास पावसाचा जोर ओसरला, तर चिपळुणातील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरल्याने अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेली.
हे पण वाचा: “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो नागरिक पाण्यात अडकले आहेत.
Read Also :
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर