कोल्हापूर: कोल्हापुरात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीने गुरुवारी रात्री धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी ४६ फूट एक इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हे पण वाचा: सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
जिल्ह्यातील नद्यांची धोका पातळीवरून वाढण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात नद्यांना आलेला पूर पाहून पूरग्रस्त भागातील लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन केले जात आहे. यासाठी कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी भर पावसात पूरग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
हे पण वाचा: “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना शक्य असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.
हे पण वाचा: राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
दरम्यान शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक भागांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला आहे. कोल्हापूर शहराच्या ही अनेक भागात पाणी सासळ्याने नागरिकांची दैना झाली आहे. पुराचा धोका वाढू नये यासाठी या लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे असे प्रयत्न सुरू आहेत. आज भर पावसामध्ये आमदार ऋतुराज पाटील, महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडी यांच्यासह अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. पावसाचे पाणी वाढत आहे त्यामुळे तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे,असे आवाहन ऋतुराज पाटील यांनी केले आहे.
Read Also :
- “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल