सागली: मुसळधार पावासामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अचानकपणे मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी तब्बल ३० फुटांवर जाऊन पोहोचली आहे. झपाट्याने नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे. तर बाकीच्या १५ घरांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढत होत असल्यामुळे सध्या नदीकाठच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे पण वाचा: “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
सांगलीत काल सायंकाळी ७ च्या सुमारास पाणीपातळी २७ फुटांवर पोहोचली होती. तेव्हापासून महापालिका प्रशासनाकडून खबरदारी म्हणून पूर पट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आता कृष्णेची पाणीपातळी ३० फुटांवर पोहोचली असून ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या सुर्यवंशी प्लॉट, मगरमच्छ कॉलनीमध्ये महापालिका टीमकडून मेगा फोनद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन जात केले आहे.
हे पण वाचा: वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी
कृष्णेची पाणीपातळी आणखी वाढणार
याचबरोबर ज्यांच्याकडे राहाण्याची सोय नाही, अशा नागरिकांसाठी महापालिकेने शाळा क्रमांक १४ आणि शाळा क्रमांक २४ या दोन ठिकाणी तात्पुरता निवारा केंद्र सुरू केले आहे. कृष्णेची पाणीपातळी आणखी वाढणार असल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले असून महापालिकेचे वैद्यकीय, आपत्कालीन तसेच अग्निशमन विभागाकडून पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
Read Also :
- “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…
- मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात केली गेली मोठी कारवाई