मुंबई : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ३०० भारतीयांची केंद्र सरकारने जासूसी केल्याचा आरोप, विरोधकांनी मोदी सरकारवर केला असून, पिगॅसस या इस्त्रायली सॉफ्टवेअरचा वापर करून, हॅकिंगद्वारे या सर्वांवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ३०० मध्ये ४० पेक्षा जास्त पेशाने पत्रकार असून, न्यायाधीश, सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योगपती आहेत, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी उचलले मोठे पाऊल
दरम्यान, यावरून आता काँग्रेस अधिकच आक्रमक झाली असून, काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “पेगॅसस हेरगिरी प्रकरणातील सत्य जनतेसमोर यावं, यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे,” असं सांगितलं. तसेच, त्यांनी यात राष्ट्रपतींनी लक्ष घालावं, अशी मागणी करत, उद्या राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनाबाहेर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
“दूध का दूध पानी का पानी”, केंद्राने राज्यांना दिले इतक्या कोटींचे डोस
त्यानुसार, आज काँग्रेसकडून राजभवन परिसरात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी, काँग्रेसच्या ३१ जणांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन, या प्रकरणात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यानंतर, घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, “पेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे,” असा जोरदार हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं.
वाढदिनी फडणवीसांनी केलं असं काही; की लोणकर कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
तसेच, “या सरकारने देशातील व राज्यातील अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, न्यायाधीश, उद्योगपती, पत्रकारांचे फोन टॅप केले होते. लोकशाहीचा खुन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम्ही आज विरोध केला आहे. आज लोकशाही धोक्यात आली असून, ती वाचवली पाहीजे. त्यासाठी याबाबत तातडीने चौकशी झाली पाहीजे आणि महाराष्ट्र सरकारने याबाबत एका समितीची स्थापना केली आहे. याबाबत आम्ही राज्यपालांना सांगितले,” अशी माहिती त्यांनी दिली.
ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाचा १०० कोटी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा झटका
या शिष्टमंडळात उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, पशु संवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसिम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष संजय राठोड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, आ. अमर राजूरकर, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. झिशान सिद्दीकी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, प्रमोद मोरे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
Read Also :
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…
- मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात केली गेली मोठी कारवाई
- फडणवीसांच्या नेतृत्वातल्या युती सरकारचा, हेरगिरी प्रकरणात सहभाग? काँग्रेसकडून पुराव्यानिशी खुलासा