मुंबई : राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. काही प्रमाणात का होईना राज्य आणि केंद्र सरकारने आपली जबाबदारी ओळखून, हातात हात घालून काम केल्याने, राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. तसेच, लसीकरण आणि निर्बंध यांमुळे देखील हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; ‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही
या पार्श्वभूमीवर, मुंबईत सर्वसामान्यांसाठी अजूनही लोकल प्रवासावर बंदी आहे. मात्र नागरिक आता बाहेर पडत असून, लोकल बंद असल्याने मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे, हा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी लोकांकडून लोकलवर असणारी बंदी हटवण्याची मागणी होत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, लोकलमधून प्रवास करू देण्यासंदर्भात तातडीने पावलं उचलण्याची मागणी केली आहे. करत राज यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिला आहे.
“दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
यासंदर्भांत त्यांनी ट्विट करत हे पत्र शेअर केलं असून, या पत्रात त्यांनी, “बस सुरू आणि लोकल बंद यानं नेमकं काय साध्य होणार?,” असा सवाल उपस्थित करून, “राज्य सरकारला अजूनही टाळेबंदी आणि निर्बंधांच्या पलिकडे काही सुचत नाही,” अशी टीका केली आहे. तसेच, “आता लोकांची सहनशक्ती संपली असून, लोकल प्रवास तातडीनं सुरू केला नाही तर आंदोलन देखील केले जाईल,” असा इशारा देत, “नागरिकांचे हे रोजचे हाल थांबवण्यासाठी, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांना लोकल प्रवासाचा लाभ घेऊ देण्यात यावा,” अशी कळकळीची मागणी केली आहे.
मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे करत आहे.@CMOMaharashtra pic.twitter.com/UfFGDI8uau
— Raj Thackeray (@RajThackeray) July 22, 2021
दुसरीकडे, राज्यात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीची जोरात चर्चा आहे. या निवडणुकांच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तयारी सुरु केली असून, सक्रिय होत त्यांनी नाशिक, पुणे शहरांचा लागोपाठ दौरा करून पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
दरम्यान, नाशिक दौऱ्यावेळी राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची नाशिकच्या शासकीय निवासस्थानी १५ मिनिटांची चर्चा-भेट झाली. यानंतर पाटलांनी, “ते आमच्यापासून दूर गेले नाहीत”, असं सांगितलं, तर यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, “योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असं सूचक विधान केलं. त्यामुळे आगामी काळात हे दोन पक्ष हातात हात घालून एकत्र येऊ शकतात या चर्चांना उधाण आलं आहे.
Read Also :
- कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही, भाजप नेत्यांचा अजब दावा
- मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात केली गेली मोठी कारवाई
- फडणवीसांच्या नेतृत्वातल्या युती सरकारचा, हेरगिरी प्रकरणात सहभाग? काँग्रेसकडून पुराव्यानिशी खुलासा
- चिपळूणमध्ये ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
- आरोग्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू नाही