मुंबई: महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे, हे सरकार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा महाविकास आघाडीचे सरकार पाडून तिथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा खळबळजनक आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.
हे पण वाचा: उपमुख्यमंत्र्यांनंतर ‘अनलॉक’ बाबत राजेश टोपेंचेही सूचक विधान!
ते म्हणाले की, मोदी-शहा या जोडगोळीने कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले. त्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार या दोघांनी उलथवून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. आता या दोघांची नजर महाराष्ट्रावर आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नेत्यांवर पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे का, याची मला कल्पना नाही. मोदी व शहा पेगॅससची मदत आता घेतात का, हेही मला माहीत नाही. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेशात जे घडले, तो महाराष्ट्रासाठी इशारा आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप नेते व घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या सध्याच्या हालचाली पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्यांचे इरादे चांगले नाहीत.
हे पण वाचा: फडणवीसांना माझे नेते मानण्याचा विषयच नाही कारण…पंकजा मुंडेंचे पुन्हा स्पष्टीकरण
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट
आमच्या “एकला चलो रे” या नाऱ्याकडे गांभीर्याने बघू नका. पंधरा वर्षे महाराष्ट्रात आपण दोघे सत्तेत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढलो. मंत्रिमंडळ बैठकीत आपण एकत्र निर्णय घ्यायचो आणि स्थानिक निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करायचो. आताही तेच करायचे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजावू. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या भेटीत असा संवाद झाला की काय? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
हे पण वाचा: फडणवीसांना धक्का; जलयुक्त शिवार योजनेच्या एसीबी मार्फत चौकशीची शिफारस
मोदी-अजित डोवाल यांचे इस्रायल दौरे कशासाठी?
२०१८-२०१९ या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावरून वादंग निर्माण झाले होते. याच दौऱ्यादरम्यान एनएसओ या कंपनीशी पेगॅसस तंत्रज्ञान विकत घेण्याबाबत बोलणी झाली असावी, असाही आरोप होत आहे. मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही काही वेळा इस्रायलला भेट दिली होती. डोवाल यांचे दौरे पेगॅससच्या मुद्द्याशी निगडित होते का, असाही सवाल विरोधकांनी विचारला आहे.
Read Also :
- ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…
- चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का उठवली ? कारणे, परिणाम व उपाय..
- फडणवीसांना धक्का; जलयुक्त शिवार योजनेच्या एसीबी मार्फत चौकशीची शिफारस
- गृहखात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर मेहरबान, इतर पक्षाच्या नेत्यांवर मात्र कारवाई
- संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका, शिवसेना खासदार ११ मागण्यांचं निवेदन घेऊन पंतप्रधानांना भेटणार