चिपळूण: रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण परिसर जलमय झाला. सर्वदूर पाणी साचल्याने तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचे पाणी शहरातील अनेक भागात पाणी साचले त्यामुळे अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना वाटते आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहेत. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.
हे पण वाचा: केंद्र सरकार म्हणतंय…”देशात ऑक्सिजन अभावी लोकांचे मृत्यू नाहीत”, विरोधकांकडून हल्लाबोल
२६ जुलै २००५ ला झालेल्या ढगफुटी चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधींची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची लक्षण दिसत आहेत. हवामान खात्याने चार दिवस ‘हाय अलर्ट’चा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या.
हे पण वाचा: आरोग्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू नाही
वाहतुकीवरही परिणाम
मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल पूर्ण पाण्याखाली गेले आहेत.
हे पण वाचा: “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढते आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.
भरती आणि जोरदार पाऊस एकाचवेळी आल्याने पूरस्थिती
हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे असे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु केले आहे. तर रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अश्या ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत.
पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे (खेड साठी १ व चिपळूण साठी १) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत आहेत. तातडीची गरज लगल्यास 94202 44937 अजय सूर्यवंशी, आपत्ति निवारण अधिकारी यांना संपर्क करावा असे आव्हान करण्यात येत आहे.
विनायक राऊत कोकणाकडे रवाना
कोकणात पावसाने हाहाकार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचा बहुसंख्या भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, बाजारपेठा पूर्णत: पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरंच्या घरं बुडाली आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. अशा भीषण स्थितीमुळे शिवसेना खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे रवाना होत आहेत. खासदार विनायक राऊत हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत.
Read Also :
- आरोग्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू नाही
- भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; ‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही
- “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
- महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
- ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…