मुंबई : संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या ‘पिगॅसस’ प्रकरणावरून गाजत आहे. यावरून विरोधकांनी संसदेत मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले असून, जगभरातील ४५ देशांपैकी, या इस्त्रायली सॉफ्टवेअरचा वापर करून, मोदी सरकारनेसुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नामांकित व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा आणि त्यांची हेरगिरी केल्याचा आरोप, काही समाज आणि वृत्त पत्र माध्यमांनी, तसेच विरोधकांनी केला आहे.
का होतोय केंद्रावर नागरिकांची हेरगिरीचा केल्याचा आरोप? काय आहे नेमकं ‘पेगासेस’ प्रकरण; वाचा थोडक्यात
दरम्यान, यावरून राज्यात देखील रणकंदन सुरु असून, २०१९ मध्ये राज्य शासनातील काही अधिकारी निवडणूक निकाल लागल्यानंतर इस्त्राईलला गेल्याचे समोर मविआतील नेत्यांनी समोर आणले. हे सर्व या प्रकरणाचा एक भाग आहेत आणि राज्यातही अशी हेरगिरी झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले.
धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
यावेळी त्यांनी, “हा सरकारला, संविधानाला आणि लोकशाहीला बदनाम करण्याचा डाव आहे. युपीए प्रणित सरकारच्या काळात देखील पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तात्कालीन सरकारने काही महत्वाच्या आणि अति महत्वाच्या व्यक्तींवर पाळत आणि हेरगिरी केल्याचे स्पष्ट केले होते आणि या निर्णयाचे समर्थन देखील केले होते,” असे सांगताना, “काही अधिकारी इस्त्राईलला गेले होते. मात्र, हे अधिकारी कृषी अभ्यासासाठी गेले होते. त्यामुळे, पाळत ठेवल्याचा आरोप चुकीचा आहे,” अशी कबुली दिली.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
यावर आता, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत, एक शासकीय पत्र शेअर केले आहे. त्यात, “आदरणीय फडणवीस साहेब, यात शेती व शेती तंत्रज्ञान हा विषय नाही,’ असं म्हटलं आहे. या पत्रात देखील ठळकपणे, कुठेही कृषी किंवा कृषी तंत्रज्ञानाचा उल्लेख नाहीये. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग झाल्याचा आरोप पहिल्यांदा फडणवीस सरकारवर केला होता, यांनतर भाजपतलेच काही नेते आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे देखील फोन टॅप होत असल्याचा आरोप मविआ सरकारमधल्या मंत्र्यांनी केला आहे.
आदरणीय फडणवीस साहेब, यात शेती व शेती तंत्रज्ञान हा विषय नाही ….. pic.twitter.com/3gN3d1m7en
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 21, 2021
काय आहे ‘पेगॅसस’? सामान्यांसाठी उपलब्ध आहे का?
हे सॉफ्टवेअर फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. सामान्य नागरिकांना ते वापरण्यासाठी उपलब्ध नाही.
कसं काम करतं ‘पेगासस’?
ज्या व्यक्तीच्या फोनला हॅक करायचं आहे. त्या व्यक्तीच्या फोनमध्ये ‘पेगासस’ इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. यात जास्त करून, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. आणि जसं त्या लिंकवर यूजर क्लिक करतो, सॉफ्टवेअर आपोआप इन्स्टॉल होतं.
व्हॉटस अपमध्येही इन्स्टॉल होतं?
हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन २०१९ मध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होत. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक बग शोधून काढून, त्याच्या आधारे नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. आणि एका कोडद्वारे या सॉफ्टवेअरला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.
पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं?
पेगासस इन्स्टॉल केल्यावर हॅकर्स, तुमच्या फोनला कमांड देऊन, फोनचं नियंत्रण मिळवतात आणि हवी ती माहिती मिळवतात. यात अनेक खाजगी गोष्टी असू शकतात. जसे की पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज इ. तसेच, ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात, फोनचा कॅमेरा, माईक वाटेल तेव्हा चालू करु शकतात.
पेगासस एवढं फेमस का आहे?
- कमी बँडविथवर काम करु शकतो. फोनची बॅटरी खात नाही. मेमरी, त्यातला डेटा संपवत नाही, त्यामुळे विनासंशय फोन हॅक होतो.
- अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित. iOS लाही हॅक करु शकतो.
- फोन लॉकचा फरक पडत नाही.
Read Also :
- पिगॅसस प्रकरण: आक्रमक काँग्रेसने उचलले आंदोलनाचे पाऊल, भाजपवर केला मोठा आरोप
- “विरोधकांकडून भारतीय लोकशाहीला बदनाम करण्याचा कट”, पिगॅसस प्रोजेक्टवरून फडणवीसांचा गंभीर आरोप
- “काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
- मोदींच्या काळात फोन टॅप झाले नाही, मनमोहन सिंगांच्या काळात झाले – फडणवीसांचा दावा
- मोदी-शहांवर सामनातून टीका: पेगॅसस’चा हल्ला हा आणीबाणीपेक्षा भयंकर