मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसून येत आहे. परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह ४ पोलीस अधिकाऱ्यांवर आणि इतर २ जणांवर खंडणी आणि फसवणुकीप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
फडणवीसांच्या नेतृत्वातल्या युती सरकारचा, हेरगिरी प्रकरणात सहभाग? काँग्रेसकडून पुराव्यानिशी खुलासा
ठाण्यातील श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने परमबीर सिंग यांच्यासह इतर ८ जणांवर हे गंभीर आरोप केले असून, आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी तब्ब्ल १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा धक्कादायक आरोप या व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध भा.दं.वि. कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६७, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), १६६, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
A case of extortion registered against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file pic), at Marine Drive Police Station. Complainant is a businessman. FIR names a total of 8 people,incl 6 Police personnel. Two civilians arrested in this matter so far: Mumbai Police pic.twitter.com/2tHMbIB7Wg
— ANI (@ANI) July 22, 2021
चिपळूणमध्ये ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी संजय पुनमिया आणि सुनील जैन या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच, परमबीर सिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून, ACB ला सिंग यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, सोबतच ते ईडीच्याही रडारवर असून लवकरच त्यांची चौकशी होणार, असल्याची माहिती समोर आली आहे.
Read Also :
- आरोग्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू नाही
- भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; ‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही
- “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
- महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
- ‘बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रद्रोह झाला असता’ यशोमती ठाकूर म्हणतात…