मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, निलंबित API सचिन वाझेला दर महिना १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. यानंतर राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणात आता ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
फडणवीसांच्या नेतृत्वातल्या युती सरकारचा, हेरगिरी प्रकरणात सहभाग? काँग्रेसकडून पुराव्यानिशी खुलासा
सीबीआयनं परमबीर सिंग यांच्या पत्रावरून केलेल्या तपासनंतर, अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुखांनी उच्च न्यायालयात केली होती, ती न्यायालयाने आज फेटाळली असून, सीबीआयच्या याचिकेतल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या, तसेच सचिन वाझे बाबतच्या उल्लेखावर आक्षेप घेत, ठाकरे सरकारने तो भाग एफआयआरमधून वगळण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती, ही याचिका देखील न्यायालयाने फेटाळली आहे.
मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात केली गेली मोठी कारवाई
राज्य सरकारला आजच्या निकालावर २ आठवडे स्थगिती हवी होती, कारण त्यांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची होती, मात्र हायकोर्टाने निकालास स्थगिती देण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, अनिल देशमुख यांच्याबाबत देण्यात आलेल्या निकालालाही स्थगिती देण्याची अनिल देशमुख यांच्या वकिलाची मागणी होती. सीबीआयचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने ही याचिकाही फेटाळली आहे. त्यामुळे, या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचा सीबीआयचा मार्ग मोकळा झाला आहे.
Bombay High Court dismisses a plea of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh seeking quashing of FIR against him registered by CBI in a corruption case
The court also dismisses a petition by the state govt, challenging few paragraphs of the CBI FIR against Deshmukh pic.twitter.com/49EuFlqSoO
— ANI (@ANI) July 22, 2021
कोरोना जोपर्यंत संपणार नाही, तोपर्यंत जेवणार नाही, भाजप नेत्यांचा अजब दावा
दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसून येत आहे. परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह ४ पोलीस अधिकाऱ्यांवर आणि इतर २ जणांवर खंडणी आणि फसवणुकीप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, एका बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर या सर्वांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
Read Also :
- देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, तर मग हे काय? रोहित पवार म्हणतात….
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…