मुंबई: राज्यात गेल्या २-३ दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचा सर्वात जास्त तडाखा मुंबई आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. रत्नागिरी , सिंधुदुर्ग आणि चिपळूण येते जोरदार अतिवृष्टी झाली असून महापुराचे संकट आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता तरी राज्य सरकारने कोकणाला मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे पण वाचा: चिपळूणमध्ये ढगफुटीमुळे भीषण परिस्थिती; २००५ ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षभरात कोकणाला बसलेला हा तिसरा फटका असून परिस्थिती भीषण आहे . यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळावेळी राज्य सरकारने कोकणाला मदत केली नाही. किमान आतातरी मदत द्यावी. तसेच आवश्यक त्या सर्व यंत्रणा मदतीसाठी तयार ठेवाव्यात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
हे पण वाचा: अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
बुधवारपासून मुसळधारपणे कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण शहर जलमय झाले आहे. अनेक गावांचेही पूल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला आहे. या ठिकाणी असलेल्या वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे.
हे पण वाचा: सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…
वाहतुकीवरही परिणाम
मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल पूर्ण पाण्याखाली गेले आहेत.
हे पण वाचा: आघाडीत बिघाडी होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय, आव्हाड म्हणाले आनंद आहे!
रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी वाढते आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.
हे पण वाचा: मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात केली गेली मोठी कारवाई
भरती आणि जोरदार पाऊस एकाचवेळी आल्याने पूरस्थिती
हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे असे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका २ बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु केले आहे. तर रत्नागिरी मधून १, पोलीस विभागाकडील १ व कोस्टगार्डची १ बोट अश्या ३ बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत.
हे पण वाचा: मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
पुणे हुन NDRF च्या दोन टीम पुणे (खेड साठी १ व चिपळूण साठी १) येथून रेस्क्यू ऑपरेशनसाठी निघालेल्या आहेत. तटरक्षक रक्षक दलाला हेलिकॉप्टर मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करणेत येत आहेत. तातडीची गरज लगल्यास 94202 44937 अजय सूर्यवंशी, आपत्ति निवारण अधिकारी यांना संपर्क करावा असे आव्हान करण्यात येत आहे.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- आरोग्यमंत्र्यांकडून मोठा खुलासा: दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू नाही
- भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य; ‘प्रशासन दुकानं उघडण्याच्या आड आलं, तर मिरजेला दंगल नवीन नाही
- “दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा
- महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहाचा प्रयत्न, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप