मुंबई : गेल्या जवळपास २ वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे जीव गेले. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेत महामारीचा कहर उभ्या देशाने पाहिला. राज्य हे मृतांच्या आणि बाधित रुग्णांच्या संख्येत क्रमांक एकवर आलं.
वाढदिनी फडणवीसांनी केलं असं काही; की लोणकर कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
मात्र, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीतले मंत्री याचं खापर केंद्रावर फोडत आहेत, तर विरोधकांनी याला ठाकरे सरकारचं कसं जबाबदार आहे, हे दाखवण्याचा चंग बांधला आहे. मात्र, यात नुकसान राज्यातल्या नागरिकांचचं होत आहे. दरम्यान, राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. काही प्रमाणात का होईना राज्य आणि केंद्र सरकारने आपली जबाबदारी ओळखून, हातात हात घालून काम केल्याने, राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे.
ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाचा १०० कोटी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा झटका
तसेच, लसीकरण आणि निर्बंध यांमुळे देखील हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान देशात लसीकरणाचा अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात काहीच ताळमेळ नसल्याचे देशातल्या संपूर्ण जनतेने पहिले. यातच आता डेल्टा व्हेरिएंट विषाणू पुन्हा डोकं वर काढलं असून, तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
#𝐂𝐎𝐕𝐈𝐃𝟏𝟗 𝐕𝐚𝐜𝐜𝐢𝐧𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐔𝐏𝐃𝐀𝐓𝐄
➡️ More than 43.79 Cr vaccine doses provided to States/UTs.
➡️ More than 3.20 Cr doses still available with States/UTs and private hospitals to be administered.https://t.co/1hn8AuD2rP pic.twitter.com/Ksll6pQQma
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 22, 2021
दरम्यान, ही लाट नियंत्रीत करण्यासाठी सध्या लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी लसीकरणावर भर देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहे. तसेच, यावेळी राज्यांना देण्यात आलेल्या लसींचा आकडा देखील आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. गेल्या २४ तासात देशात महामारीचे नवे ४१,३८३ रूग्ण आढळले आहेत, तर २४ तासात देशात ५०७ रूग्णांचा मृत्यु झाला आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.३५ % इतका आहे.
Read Also :
- देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, तर मग हे काय? रोहित पवार म्हणतात….
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…