मुंबई : नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. त्यांनी वेल मध्ये येत घोषणाबाजी केली. तसेच, हंगामी तालिका अध्यक्षांचा माईक हिसकावून घेतला. या गोंधळानंतर विधानसभा तहकूब करण्यात आली.
“दूध का दूध पानी का पानी”, केंद्राने राज्यांना दिले इतक्या कोटींचे डोस
दरम्यान, यानंतर हा गोंधळ इथेच थांबला नाही, तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजप आमदारांवर करण्यात आला आणि कामकाज सुरु झाल्यावर भाजपच्या १२ आमदारांवर १ वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.
वाढदिनी फडणवीसांनी केलं असं काही; की लोणकर कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
यातच आता या कारवाईचा निषेध भाजपने केला असून, यानंतर तातडीने त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत असून, या निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ४ याचिका दाखल केल्या असून, “आमचं निलंबन चुकीच्या पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या करण्यात आलं आहे आणि त्याच्याविरोधातच सर्वोच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे
ठाकरे सरकारने भाजपाच्या आम्हा १२ आमदारांना चूकिच्या व बेकायदेशीरपणे निलंबित केले त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका केली! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/mAWKHQuyI1
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 22, 2021
तसेच, “ज्या ठरावाद्वारे आम्हाला सभागृहात निलंबित करण्यात आलं, तो बेकायदेशीर असल्याने, हा ठराव अवैध करार करण्यात यावा, असं प्रतिज्ञापत्र आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. या आदेशावर तात्पुरती स्थगिती मिळावी आणि या याचिकेवर निर्णय येईपर्यंत आम्हा १२ आमदारांना सर्व अधिकार बहाल करण्यात यावे,” अशी मागणी देखील केल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाचा १०० कोटी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुखांना मोठा झटका
कोण आहेत १२ आमदार ?
आशिष शेलार
अतुल भातखळकर
राम सातपुते
संजय कुटे
योगेश सागर
किर्तीकुमार बागडिया
गिरीश महाजन
जयकुमार रावल
अभिमन्यू पवार
पराग अळवणी
नारायण कुचे
हरिश पिंपळे
Read Also :
- देशात ऑक्सिजनअभावी मृत्यू नाही, तर मग हे काय? रोहित पवार म्हणतात….
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…