मुंबई: कोकणातल्या विविध भागात सलग तीन दिवसापासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. चिपळूण शहरात सर्वात जास्त हाहाकार उडाल्याचं पाहण्यास मिळतं आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे.
हे पण वाचा: सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
राज्याला चांगला ड्रायव्हर नको, लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री गाडी चालवत पंढरपूरला गेले. पण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबीयांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे तर चांगला मुख्यमंत्री हवा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कॅबिनेटला जायचं नाही आणि पंढरपूरला जायचं यात काय भूषण आहे, असा खोचक टोला नाराय राणे यांनी लगावला आहे.
हे पण वाचा: वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी
राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही, कोकणात अतिवृष्टी झाली, लोकांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांच्यासाठी तरतुद करुन ठेवायला हवी होती, याची माहिती नव्हती का? आजच पाऊस पडला का? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याना माणुसकी आहे का? अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. अतिशय गंभीर परिस्थिती आहे राज्यात विकास ठप्प आहे असं राणे यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा: निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी उचलले मोठे पाऊल
केंद्राकडून मदतीचं आश्वासन
कोकणात जवळपास ३५० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. कोकणात जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्याविषयी आपण केंद्राशी बोललो आहे, त्यांनी मदतीचं आश्वासन दिल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती राणे यांनी दिलीय.
Read Also :
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
- अनिश्चित काळासाठी सर्वसामान्यांना बंद ठेवणार आहात? चंद्रकांत पाटील यांचा राज्य सरकारला सवाल
- मुख्यमंत्र्यांनी घेतला चिपळूणच्या महापुराचा आढावा, यंत्रणांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे आदेश
- सर्वसामान्यांसाठी राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, म्हणाले…