मुंबई: राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी हा:हाकार माजवला. कोकणाला याचा मोठा फटका बसला. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या अनेक भागातही पुराचा फटका बसला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजीया खान यांनी ईदनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद वापर, खासदार श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलवंदना चव्हाण आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. या सर्वांसोबतचा फोटो काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फौजीया यांनी ट्विट केला.
हे पण वाचा: सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती असतानाच दुसरीकडे सत्तेत असणाऱ्या घटक पक्षातील नेत्यांनी ईदनिमित्त स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे पाहून अनेकांनी या ट्विटखाली संताप व्यक्त केला.
आज ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी व स्नेहभोजनासाठी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब,मा श्रीनिवास पाटील साहेब, मा प्रफुल्ल पटेल साहेब, मा वंदनाताई चव्हाण, मा सुप्रिया ताई सुळे आपण सर्व उपस्थित राहिलात …. आपले शतशः आभार 💐💐💐💐 pic.twitter.com/HXOhQgbt7b
— Fauzia Khan (@DrFauziaKhanNCP) July 22, 2021
दरम्यान या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावरुन वाद सुरु असला तरी दुसरीकडे आजही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये २३ जुलैला मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतरही दोन दिवस पाऊस कायम राहणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांत आणखी तीन ते चार दिवस मुसळधारांचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील घाटक्षेत्रांत २३ जुलैला मुसळधार आणि त्यानंतर तीन दिवस पाऊस कायम राहणार आहे.
हे पण वाचा: “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. ग्रामीण भागासह मुख्य शहरांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हे पण वाचा: राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
चिपळूणमध्ये गुरुवारी भीषण परिस्थिती
पुढील काही तास पावसाचा जोर ओसरला, तर चिपळुणातील पूरस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. मात्र कोळकेवाडी धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने पाण्याचा विसर्ग कधीही करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळुणात भीषण परिस्थिती निर्माण झाली. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरात पाणी शिरले. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये मध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरल्याने अख्खी बाजारपेठ पाण्याखाली गेली.
हे पण वाचा:
याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर शहरातील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो नागरिक पाण्यात अडकले आहेत.
Read Also :
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
- “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन