पुणे : पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत झालेल्या तुफान पावसामुळे, पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, पूरग्रस्त भागांसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
कोकणात पूरस्थिती गंभीर, उपासमारीने लोकांचे हाल, पिण्यासाठी एक थेंबही पाणी नाही
“या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लसींची मागणी करणार आहोत. जिथे जिथे पूरस्थिती आहे, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. या भागात लसीकरण करा असं सांगितलं आहे, आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील,” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच, यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन आम्ही पंतप्रधानांना भेटायला जाणार आहोत”, असं देखील त्यांनी सांगितलं आहे
पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्रातील पूर परिस्थिचा घेतला आढावा
दरम्यान, पूरग्रस्त भागांत शेकडोंच्या संख्येनं नागरीक पाण्यात अडकले आहेत. या सहयाद्रीच्या आणि कोकण किनारपट्टीच्या पट्ट्यांत अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे बचाव पथकांना या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या देखील त्या-त्या जिल्ह्यात पाठवण्यात आल्या असून, युद्ध पातळीवर त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर
तसेच, या भागांतील आणि नदीकाठच्या गावातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली असून, ग्रामीण भागातील अनेक भागांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला आहे. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने देखील प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. या भागांतील नद्यांच्या पाणीपातळीत वाढत होत असल्यामुळे, सध्या नदीकाठच्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read Also :
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी युवा सेनेना सज्ज, काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा
- भाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय? शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु
- बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर घर मिळणार’, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- वर्षभरात कोकणात तिसऱ्यांदा फटका, राज्य सरकारने आता तरी मदत करावी; फडणवीसांची मागणी