मुंबई: मागील काही दिवसापासून अनेक सरकारांनी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच स्वप्न दाखवलं. अखेर ते सत्यात उतरणार असल्याचं दिसून येत आहे. अखेर बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने आहे. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे.
हे पण वाचा: कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, २७ जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ होणार असून हा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित पार पाडणार आहे. त्यापुढे त्यांनी या भूमिपूजनाची इतिहासात नोंद होईल असाही उल्लेख केला आहे.
बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच मुंबईकरांच स्वप्न…
27 जुलै रोजी पुनर्विकासाचा भूमिपूजन समारंभ!
मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व
मा .शरदचंद्र पवार ह्यांच्या उपस्थित …
इतिहासात नोंद होईल@OfficeofUT @PawarSpeaks @AUThackeray pic.twitter.com/LLECen1iYi— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 22, 2021
हे पण वाचा: राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
बीडीडी चाळ पुनर्विकासात निवासस्थान हे दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याठिकाणी पोलीस दलाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या निवासस्थानांपैकी काही निवासस्थाने दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकडे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडेही आहेत.
हे पण वाचा: “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
काही दिवसांपूर्वी याबाबत एक बैठक झाली होती. या बैठकीत दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बीडीडी चाळ पुनर्विकासात कुणालाही पुनर्वसनापासून वंचित ठेवले जाणार नाही. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे तो सुनियोजितपणे पूर्ण होईल असे प्रयत्न आहेत.
Read Also :
- पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्रातील पूर परिस्थिचा घेतला आढावा
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका