मुंबई: पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे. त्यातही सर्वाधिक फटका बसलाय तो रत्नागिरीतील चिपळूण शहराला. चिपळूण शहर पाण्याखाली गेलं असून अजूनही पाणी कमी झालेलं नाही. शेकडोंच्या संख्येनं नागरीक पाण्यात अडकले आहेत. आज दिवसभरात चिपळूणमध्ये पडलेला २०२ मिमी पाऊस आणि त्यापाठोपाठ कोयना धरण भरल्यामुळे खालच्या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागला. दोन्हीकडून पाणी शहरात आल्यामुळे आख्खं शहर पाण्याखाली गेलं आहे.
हे पण वाचा: “लोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे”च्या घोषणा देत काँग्रेसने दणाणून सोडले राजभवन
वेळ अशी ओढवली आहे, की, शेकडो घरांमध्ये, संकट सरेपर्यंत चूलदेखील पेटणार नाही… शिजविण्यासाठी अन्नधान्य नाहीच, पण चहूकडे पाणी पसरलेले असताना पिण्यासाठी मात्र थेंबही नाही अशी स्थिती ओढवली आहे. तातडीने किमान पिण्याचे पाणी व बिस्किटे पुरवली पाहिजेत#कोकण #चिपळूण १/७
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 23, 2021
कोणातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले आहे, नागरिकांचे हाल होत आहे. खाल्याला अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, चारही बाजूने पाणीच पाणी असल्याने नागरिक गोंधळून गेले आहे. त्यांच्यावर उपार मारीची वेळ आली आहे. अशा वेळी सरकारने पाणी बाटली आणि बिस्किट तातडीने पुरव्याला हवे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये ट्टिट केले आहे.
हे पण वाचा: “बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो” हे पुणे आहे, हाताने हसू करु घेऊ नये!
रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्याला फटका
महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रत्नागिरी, कोल्हापूरमधील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहात असल्यामुळे बचाव पथकांना या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. एनडीआरएफच्या तुकड्या त्या त्या जिल्ह्यात पाठवण्यात आल्या असून त्यांनी बचावकार्य सुरू केलं आहे. त्यात सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूणमध्ये एनडीआरएफनं बचावकार्य सुरू केलं असून ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
हे पण वाचा: राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
पाऊस काळ बनून कोसळतोय
परभणीत अनेक गावांचा संपर्क तुटल्याने लोक हवालदिल झाले आहेत. एकंदरीत महाराष्ट्रावर पाऊस काळ बनून कोसळत आहे. कोरोनाच्या संकटाशी राज्य व जनता लढत असताना हे ओले संकट उभे ठाकले आहे. कालपर्यंत ज्या नद्या कोरड्याठाक पडल्या होत्या त्या आता धोक्याची पातळी ओलांडून गावात, घरांत शिरल्या आहेत. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत.