पुणे : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातही पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत झालेल्या तुफान पावसामुळे, पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, लसीकरण करणार जलद गतीने
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “महाराष्ट्रात गेल्या ६-७ दिवसांपासून अतिवृष्टी होत असून, त्यामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. कोकणात पूर आल्याने कोकणवासियांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच, यामुळे रेल्वेसेवाही प्रभावित झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून, हे नुकसान भरून काढण्यासाठी स्वतंत्र बैठक केंद्रीय स्तरावर चर्चा करण्यात येणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
कोकणात पूरस्थिती गंभीर, उपासमारीने लोकांचे हाल, पिण्यासाठी एक थेंबही पाणी नाही
तसेच, मुंबईच्या रेल्वे सेवेवर बोलताना, “पावसाच्या संततधारेमुळे रेल्वे रुळांवर पाणी साचत असल्याने, सेवेवर परिणाम झाला आहे. पाणी साचण्याच्या कारणांचा आम्ही शोध घेत असून, लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. मात्र, सध्या मुंबईत रेल्वे रुळावरील पाणी उपसायचं काम सुरू असून, त्यासाठी १६० पंप लावून पाणी बाहेर ओढलं जात आहे. त्यानंतर मी स्वत: रेल्वेतून प्रवास करून, आढावा घेऊन, या समस्या दूर करणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्रातील पूर परिस्थिचा घेतला आढावा
दरम्यान, कोकणात पूरानं थैमान घातलंय. अनेक लोक बेघर झाले आहेत. काही जण बेपत्ताही झालेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला असून, कोकणाला आणि महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
Read Also :
- भाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय? शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी युवा सेना सज्ज, काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा
- बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर घर मिळणार’, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा
- पुणे महापालिकेतील २३ गावांच्या आराखड्यास मंजुरीची शक्यता; राज्य सरकार सोमवारी घेणार पहिली बैठक
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप