मुंबई : गेल्या जवळपास २ वर्षांपासून देशात महामारीचं संकट थैमान घालत आहे. राज्यात देखील महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊन, अनेक नागरिकांचे जीव गेले. दरम्यान, राज्यातली दुसरी लाट आता गेल्यात जमा आहे. राज्यात बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढायला लागले आहे. तसेच, लसीकरण आणि निर्बंध यांमुळे देखील हा परिणाम साध्य झाला आहे. परंतु, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातले निर्बंध अजूनही पूर्णपणे हटवण्यात आले नाहीयेत.
रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे म्हटले होतं. यावेळी, लसीकरणावर भाष्य करताना त्यांनी, “२ महिन्यांत राज्याचे १००% लसीकरण पुर्ण करण्याची क्षमता राज्यात आहे, पण केंद्राकडून त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. ६० ते ७०% लसीकरण झाले, तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती तिसरी लाट थोपवण्यासाठी गरजेची आहे,” असं देखील म्हटलं होतं.
या पार्श्वभूमीवर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी, “राज्याला ४-५ दिवसांत १० लाख लसींचा डोस मिळतो. हे प्रमाण रोज असायला हवे. सध्या फक्त २-३ लाख डोसेस मिळत आहेत, मात्र आमची केंद्रकेड मागणी आहे की महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस मिळावी आणि यासाठी आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन केंद्राकडे जाणार आहोत”, अशी माहिती दिली, सोबतच पूरग्रस्त भागात आरोग्य व्यवस्था सुरू केल्या असून, जलदगतीने या भागांत लसीकरण मोहीम केली जाईल,” असं त्यांनी सांगितलं आहे.
कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू- रावसाहेब दानवे
तसेच, “केंद्राकडून लसींचे जे डोसेस येतात, त्या आम्ही तातडीने नागरिकांना देतो. केंद्राच्या धोरणाप्रमाणे राज्यांना लसींचे डोसेस वितरित होतात”, असं सांगताना त्यांनी, “ऑक्सिजनमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नाही का असा सवाल केला जात आहे, पण इतर राज्यात या केसेस असतील, मात्र राज्यात ऑक्सिजन लिकेजमुळे या घटना झाल्या आहेत, असं म्हणत पून्हा एकदा त्यांनी ऑक्सिजन अभावी राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
Read Also :
- पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, लसीकरण करणार जलद गतीने
- नागपूर महापालिका निवडणुकीसाठी युवा सेना सज्ज, काँग्रेसला अप्रत्यक्षपणे इशारा
- कोकणात पूरस्थिती गंभीर, उपासमारीने लोकांचे हाल, पिण्यासाठी एक थेंबही पाणी नाही
- भाजप औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढणार काय? शिवसेनेचे जिल्हाभर संपर्क अभियान सुरु
- बीडीडी चाळीतील रहिवाशांना अखेर घर मिळणार’, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा