मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे
दरम्यान, या परिस्थितीची माहिती, तसेच पूर परिस्थितीचा आढावा, आज मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात जाऊन घेतला. यांनतर त्यांनी माध्यमांशी येऊन संवाद साधला, यावेळी त्यांनी, “सध्या ज्याप्रकारे राज्यात पाऊस पडत आहे, ते पाहता अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत, त्यामुळे अतिवृष्टी हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे,” असे वक्तव्य केले.
यावेळी त्यांनी, तळीये गावातल्या दरड दुर्घटनेविषयी भाष्य केले. “तळीये गावात कालच प्रशासनाची मदत पोहोचली होती. अनेक लोकांना या मदत कार्यात वाचवण्यात आले. गेल्या ३-४ दिवसांपासून मी या सगळ्यावर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधानांचाही मला दूरध्वनी आला. त्यांनी राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार आता नौदल, तटरक्षक दल आणि आपत्ती निवारण पथकाच्या तुकड्या राज्यात पोहोचल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
दुसरीकडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार गिरीश महाजन हे आज घटनास्थळी दाखल झाले. यावेळी, माध्यमांशी बोलताना त्यांनी, काल दुपारी ही घटना घडल्यानंतर, १९ तासांनंतरही इथे प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोहोचला नाही. त्यामुळे, प्रशासन झोपलं आहे का?, विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
त्यामुळे, आता मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाने परस्पर विरोधी विधाने केल्याने, हा नेमका काय गोंधळ आहे, याची चर्चा रंगू लागली आहे. तसेच, ग्रामस्थांच्या सांगण्यावरूनही हेच समोर येत आहे की; घटनास्थळी कोणतीही प्रशाकीय मदत घटना घडल्यानंतरच्या १२ तासानंतर दाखल झाली नाह. त्यामुळे खरं कोण आणि खोटं कोण बोलतंय?, मुख्यमंत्री सरकारला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?, की परत एकदा यात राजकारण घुसवले जात आहे? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
तसेच, या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात तसं, कालच प्रशासनाची मदत पोहोचली होती असं समजलं किंवा विरोधी पक्ष नेते म्हणतात तसं, १९ तासांनंतरही इथे प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोहोचला नाही, असं समजलं; तरीही सरकारकडून या दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्यात येणार का? दुर्घटेप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार का? हे देखील पाहणे पाहावे लागणार आहे.
Read Also :
- अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…
- २ दिवसांत तब्ब्ल १२९ मृत्यू, राज्यात पावसाने दाखवला आपला रुद्रावतार; आकडा वाढण्याची भीती
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन; घेतला आढावा
- अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
- रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू