सातारा : गेल्या आठवड्याभरापासून मुंबईसह कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, पश्चिम महाराष्ट्राच्या सहयाद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत असलेल्या सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत झालेल्या तुफान पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान, महाडच्या तळीये गावात दरड कोसळून आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अजून मोठी दुर्घटना साताऱ्यातील आंबेघर गावात घडली असून, या गावाच्या एका भागावर अतिवृष्टीमुळे मागच्या डोंगराचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मोरणा विभागात असणाऱ्या आंबेघर येथे, गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेनंतर ३ कुटुंबातील काही लोकं रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती आत्तापर्यंत केलेल्या तपासातून समोर येत आहे. इथे देखील मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडचणी येत असून, गावाकडे येणारे सर्व प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच, अजूनही इथे बचावकार्य सुरु असून, १५ आणखीन घरे या दरडीखाली दबल्याची शक्यता आहे.
पूरग्रस्त भागासाठी ठाकरे सरकारचे मोठे पाऊल, लसीकरण करणार जलद गतीने
दुसरीकडे, रायगडमध्ये अतिवृष्टीमुळे मोठी दुर्घटना घडली असून, महाड तालुक्यातील तळीये गावात ३५ घरांवर दरड कोसळून तब्बल 3६ जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे, तर सुमारे आणखीन ८०-९० लोकं ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काल संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेतील ३२ लोकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सांगितली जात आहे.
Read Also :
- राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे
- कोकणवासियांना तातडीने मदत देण्यासाठी केंद्र स्तरावर चर्चा सुरू- रावसाहेब दानवे
- कोकणात पूरस्थिती गंभीर, उपासमारीने लोकांचे हाल, पिण्यासाठी एक थेंबही पाणी नाही
- पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, महाराष्ट्रातील पूर परिस्थिचा घेतला आढावा
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका