मुंबई : आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे राज्यात अतिवृष्टी झाली असून, त्यामुळे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात पर्जन्यमापक यंत्रणा बंदच
दरम्यान, पावसामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये, गेल्या काही दिवसांत तब्बल १२९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच, यातील काही घटनांमध्ये हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
राज्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण ५ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या, यात महाड तालुक्यातील तळीये गावात, दरड कोसळून ३६, तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावात भूस्खलन होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, खेड मधील बिरमई इथं दरड कोसळलून २ जण दगावले आहेत.
यासोबतच अनेक ठिकाणी लोक पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. चिपळूण मध्ये पुराच्या पाण्याने कोव्हीड सेंटर मध्ये पाणी घुसून ८ रुगणांचा मृत्यू झाला आहे, असे एकूण मिळून राज्यातील मृतांची संख्या १२९ वर पोहोचली आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली आहे.
Read Also :
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन; घेतला आढावा
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश
- महाराष्ट्र संकटात, राज ठाकरेंची मनसैनिकांना साद!
- अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
- तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा