मुंबई : गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने, पश्चिम महाराष्ट्रात हाहाःकार उडाला असून, त्यामुळे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, महाबळेश्वर, सिंधुदुर्ग आणि कोकण पट्टयातील अनेक भागांत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे, जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे.
रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू
या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वपक्षीय नेते, विविध नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन, नुकसानीची पाहणी आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यानुसार मदतकार्य आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी राज्य सरकारकडून केली जात असून, राज्य सरकार हे सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात आहे आणि राज्यातल्या पूरपरिस्थतीची माहिती पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील, राज्यातील पावसाच्या या थैमानच्या पार्श्वभूमीवर, आपल्या पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पत्र लिहून मदत करण्याचं आवाहन केलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विटर वर देखील शेअर केली असून, यात त्यांनी,
पत्रातला मजकूर….
“महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे.
ह्या अवघड परिस्थितीत मी सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी असे आवाहन करतो. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी.
महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये.”
जय महाराष्ट्र !
– राज ठाकरे
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
महाडच्या तळीये गावात दरड कोसळून आत्तापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अजून मोठी दुर्घटना साताऱ्यातील आंबेघर गावात घडली असून, या गावाच्या एका भागावर अतिवृष्टीमुळे मागच्या डोंगराचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, २ दिवसांत घडलेल्या राज्यभरातील वेगवेगळ्या घटनांत आत्तापर्यंत १२९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Read Also :
- जयंत पाटलांचं सांगलीकरांना कळकळीचं आवाहन! मुलंबाळं, जनावरं आणि महत्त्वाच्या वस्तू घेऊन तातडीने स्थलांतरीत व्हा!
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश
- रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
- महाड येथील बचावकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरु आहे अडकलेल्यांची सुटका
- राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे