मुंबई : राज्यात अतिवृष्टीने भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे राज्यात घडलेल्या विविध भागांतल्या दरड दुर्घटनेत, तसेच पुरात वाहून जाऊन आणि अतिवृष्टीमुळे आत्तापर्यंत राज्यात १२९ नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच, हा आकडा अजून वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
२ दिवसांत तब्ब्ल १२९ मृत्यू, राज्यात पावसाने दाखवला आपला रुद्रावतार; आकडा वाढण्याची भीती
दरम्यान, आता यावरून राज्यातील ठाकरे सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांनी निशाणा साधला असून, “असंवेदनशील ठाकरे सरकार. कोकणातील जनता पूरात अडकवलेली असताना विरोधी पक्षाचे नेते कोकणाकडे धावले आहेत पण मुख्यमंत्री, मंत्री घरात बसून आहेत, आघाडीचे काही नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत. जनता वाचवायचा विषय आहे म्हणून हे निवांत आहेत, विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते,” अशी टीका भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे.
असंवेदनशील ठाकरे सरकार.
कोकणातील जनता पूरात अडकवलेली असताना विरोधी पक्षाचे नेते कोकणाकडे धावले आहेत पण मुख्यमंत्री, मंत्री घरात बसून आहेत, आघाडीचे काही नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त आहेत. जनता वाचवायचा विषय आहे म्हणून हे निवांत आहेत,विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते.#Chiplun pic.twitter.com/MyEzWTuDf2
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 22, 2021
महाडमधील तळीये इथे काल दुपारी ४ वाजता दरड कोसळून, तब्ब्ल ८०-९० जण दाबले गेले असून, त्यातील ३८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि निलंबित आमदार गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सत्ताधारी पक्षातील एकही नेता, तसेच प्रशासनातील अधिकारी किंवा पदाधिकारी इथे आला नाही, यावरून विरोधी पक्षाने आता सरकारवर हल्लबोल सुरू केला आहे.
शिवसेना घरात, काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात. अशात जनतेला धीर देण्याची जबाबदारी विरोधी पक्षालाच निभावावी लागत आहे.#Chiplun #chiplunflood #KonkanFloods @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar @girishdmahajan pic.twitter.com/bhEe3Zyso5
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 22, 2021
तसेच, राज्यात अशी भयानक परिस्थिती असताना, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांनी बिर्याणीची दावत चाखली. यावर देखील श्वेता महाले यांनी टीका करताना, “काँग्रेस कोमात आणि राष्ट्रवादी बिर्याणीच्या प्रेमात. अशात जनतेला धीर देण्याची जबाबदारी विरोधी पक्षालाच निभावावी लागत आहे,” असा हल्लाबोल केला आहे.
तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
दुसरीकडे, प्रवीण दरेकर यांनाही ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवताना, “१९ तासांनंतरही इथे प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोहोचला नाही. त्यामुळे, प्रशासन झोपलं आहे का?, विरोधी पक्षनेता धडपडत गावात येतो, सरकार कुठंय? इथे तलाठीही नाही, एवढं निगरगठ्ठ सरकार मी कधीही पाहिलं नाही,” अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.
Read Also :
- तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने
- अंधारल्या दाही दिशा… अन् बेजारलं मनं… उर जळून निघालं… बघं करपलं रानं…
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन; घेतला आढावा
- अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर
- रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पोलादपूर येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू