रायगड: कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वांत जास्त दरड कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत.
हे पण वाचा: तळीयेनंतर राज्यात अजून एक मोठी दुर्घटना, राज्यात आत्तापर्यंत एकूण ५० जणांचा
डोंगरउतारावर वसलेल्या गावांना दरड कोसळण्यापासून असलेला धोका लक्षात घेता त्यांच्या पुनर्वसनासाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील महाडजवळील तळीये कोंडाळकर वाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पावसामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये, गेल्या काही दिवसांत तब्बल १२९ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच, यातील काही घटनांमध्ये हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
राज्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात मिळून एकूण ५ ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या, यात महाड तालुक्यातील तळीये गावात, दरड कोसळून ३६, तर पोलादपूर तालुक्यातील केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी गावात भूस्खलन होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, खेड मधील बिरमई इथं दरड कोसळलून २ जण दगावले आहेत.
हे पण वाचा: महाराष्ट्र संकटात, राज ठाकरेंची मनसैनिकांना साद!
ठाण्याहून विशेष वैद्यकीय पथक
रात्री उशिरा मुसळधार पावसात प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना एनडीआरएफच्या पथकाला केली. मृतांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली आहे. याशिवाय ठाण्याहून विशेष वैद्यकीय पथक आणि टीडीआरएफचं पथक महाडमध्ये पोहोचले असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली.
Read Also :
- महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला
- नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
- हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
- “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”
- तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने