मुंबई: गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा कहर दिसून आला आहे. महाराष्ट्र राज्यात मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात पावसामुळे होणारी परिस्थिती आणि दरडी कोसळल्यामुळे सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुढचे दोन-तीन दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कोकणच्या चिंतेत भर पडली आहे.
हे पण वाचा: हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
तसेच कोकणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पावसाचाही हाहाकार पाहण्यास मिळतो आहे. चिपळूण, रायगड, महाड या ठिकाणची स्थिती चिंताजनक आहे. रायगड जिल्ह्यातलं तळये गाव हे तर भूस्खलन झाल्याने वाहून गेलं आहे. या ठिकाणी अद्यापपर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. निसर्गाचा कहर अशा प्रकारे बघायला मिळतो आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
हे पण वाचा: महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला
पंचगंगेचा कोल्हापूरला तर सांगलीला कृष्णेचा वेढा
कोल्हापूर आणि सांगलीचे टेन्शन वाढले आहे. पंचगंगेचा कोल्हापूरला, तर सांगलीला कृष्णेचा वेढा दिसून येत आहे. २०१९ पेक्षा मोठं संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. दरम्यान, पश्चिम कोकणात सिंधुदुर्गात रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला.. या पावसामुळे सिंधुदुर्गातील कर्ली आणि तेरेखोल नदीला पूर आला आहे. नदीकाठच्या अनेक गावांत पुराचं पाणी शिरलंय. माडखोल, सावंतवाडी, आंबोली मार्गावरही तीन ते चार फूट पाणी आहे.
हे पण वाचा: नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
सांगली-सातारा येथे धोका कायम
ज्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले त्यापैकी ४० हजाराहून अधिक लोक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूर शहरालगतची पंचगंगा नदी २०१९ मध्ये पूर पातळीच्यावर वाहत आहे. पुणे आणि कोल्हापूरसह जिल्ह्यात सांगली आणि सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने सातारा चांगलाच परिणाम झाला आहे.
हे पण वाचा: “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मृतांपैकी ३८ जण समुद्रकिनारी रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे झाले. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यासाठी एक नवीन रेड अलर्ट जारी केला असून येत्या चोवीस तासात जिल्ह्यातील डोंगराळ घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून, दरड कोसळल्यानंतर सुमारे ३० लोक बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्ह्यात एक बस नदीत वाहून गेली. बसमधून आठ नेपाळी कामगारांसह ११ जणांना वाचविण्यात यश आले.
Read Also :
- दरड कोसळण्याचा धोका असणाऱ्या गावांसाठी कायमस्वरुपी धोरण करणार – एकनाथ शिंदे
- महाराष्ट्रात पावसाचे थैमान, सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला
- नौदलास मदत कार्य करण्याचे निर्देश माझ्या विनंतीवरुन; संभाजीराजे म्हणतात…
- हे सरकार ‘शिवशाही’ नव्हे तर ‘शवशाही, भाजपची आघाडी सरकारवर टीका
- “जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”